Homeचिट चॅटमहामानवाला अभिवादन करा...

महामानवाला अभिवादन करा शैक्षणिक साहित्य अर्पण करून..

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी शैक्षणिक साहित्य अर्पण करून अभिवादन करावे, असे आवाहन ‘एक वही एक पेन’ अभियानाचे प्रणेते, ज्येष्ठ पत्रकार राजू झनके यांनी केले आहे. तशा आशयाचे निवेदनही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दिले आहे.

समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून महामानवाला वह्या, पेन, पुस्तकांची मानवंदना द्यावी, असा उपक्रम मागील नऊ वर्षांपासून ‘एक वही एक पेन’ अभियानाच्या माध्यमातून राबविला जातो. महापरिनिर्वाण दिन, महापुरुषांची जयंती उत्सव तसेच गणेशोत्सवासारख्या सर्व सार्वजनिक उत्सवातदेखील जनतेने शैक्षणिक जागर करून गरजू विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवावा, असे आवाहन ते सातत्याने करतात आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी या आवाहनाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला जातो.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले शिक्षण घेतले. परदेशात जाऊनदेखील त्यांनी अनेक पदव्या संपादन केल्या. देशाला सर्वोच्च संविधान दिले. वंचित घटकांना आरक्षणाचा अधिकार दिला. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन कोलंबिया विद्यापीठाने जगातील सर्वात विद्वान व्यक्ती म्हणून त्यांचा पुतळा विद्यापीठाच्या आवारात उभारला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही डॉ. आंबेडकर यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत शिक्षणाची कास सोडली नाही. ते आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जगले. समाजालाही त्यांनी शिक्षण घेण्याचा मूलमंत्र दिला. त्यामुळे त्यांना हार-फुले वाहून अभिवादन करण्यापेक्षा वह्या, पेन, पुस्तके आदी शैक्षणिक साहित्याने अभिवादन करणे हीच त्यांच्याप्रती खरी श्रद्धांजली राहणार असून राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्र्यांनी ही सूचना स्वीकारून समाजाला शिक्षणाप्रती सकारात्मक संदेश द्यावा, असे आवाहनही झनके यांनी या निवेदनाद्वारे केले आहे.

Continue reading

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...
Skip to content