Homeबॅक पेजजागतिक विद्यापीठ क्रीडा...

जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी 4 तलवारबाजीपटूंना ‘साई’चा हात!

चीनमधील चेंगडू येथे होणाऱ्या आगामी जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या एसएआयच्या नॅशनल सेंटर्स ऑफ एक्सलन्स (NCOEs)च्या चार तलवारबाजीपटूंना भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) आर्थिक मदत करणार आहे.

यामध्ये अभय कृष्णा शिंदे (NCOE पटियाला आणि टॉप्स खेळाडू), दुर्गेश मिलिंद जहागीरदार (NCOE औरंगाबाद आणि खेलो इंडिया खेळाडू) आणि NCOE पटियालाच्या खेळाडू तन्नू गुलिया आणि शिक्षा बल्लोरिया यांचा समावेश आहे.

तलवारबाजीच्या वार्षिक कॅलेंडर फॉर ट्रेनिंग अँड कॉम्पिटिशन (ACTC) योजनेंतर्गत हा कार्यक्रम समाविष्ट नसल्यामुळे, जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रदर्शनाची ज्यादा संधी मिळणार आहे. त्यामुळे भारतीय क्रीडा प्राधिकरणाने या खेळाडूंना विशेष बाब म्हणून हा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

या स्पर्धेची 31वी आवृत्ती 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या इतर NCOE खेळाडूंमध्ये NCOE बेंगळुरूचा खेळाडू हरदीप (रेस वॉकिंग) आणि ख्याती (उंच उडी), NCOE त्रिवेंद्रमचे तायक्वांदो खेळाडू शिवांगी चनांबम आणि परसीदा नोंगमाइथेम तसेच NCOE इटानगर येथील वुशू खेळाडू सनमा ब्रह्मा यांच्यासह इतर अनेक खेळाडूंचा समावेश आहे.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content