Homeन्यूज अँड व्ह्यूजवाड्यातला रस्ता २०...

वाड्यातला रस्ता २० वर्षे अर्धवट!

पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील रस्त्यांची ही स्थिती आहे. वाड्यातील एसटी थांब्याच्या आसपास सर्वत्र असेच रस्ते आहेत. मधला रस्ता सिमेंट काँक्रिटचा व बाजूच्या दोन्ही बाजूस कच्चा रस्ता. वास्तविक ज्या कंत्राटदाराने काँक्रिटचा रस्ता बांधला त्यानेच बाजूचा भागही व्यवस्थित डांबरी रस्ता करायचे बंधनकारक असते. खरेतर तालुका पंचायत समितीने त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे असते. परंतु संपूर्ण वाडा तालुक्यात असेच अर्धवट रस्ते बांधलेले दिसतात.

एका औषध दुकानदाराने सांगितले की, गेली सुमारे २० वर्षे रस्ते असेच अर्धवट अवस्थेत आहेत. वाडा ग्रामपंचायत समितीच्या आजूबाजूचा रस्ताही असाच आहे. इतकेच नव्हे तर बाजूला एक बांधकामाचे साहित्य विक्रीचे दुकान असून त्या दुकानात विक्रीला आणलेली माती वा वाळूही हा दुकानदार बाजूच्या रस्त्यावरच ठेवतो, अशी नागरिकांची तक्रार आहे. तसेच शासकीय विश्रामगृहाच्या आजूबाजूलाही बरेच टेम्पो उभे करून ठेवलेले असतात. एसटी आगाराच्या समोरच सरकारी रुग्णालय आहे. आसपास बाजारपेठही आहे. सकाळ-संध्याकाळ येथे वाहतूकही मोठ्या प्रमाणावर असते. अनेकवेळा या चौकात वाहतूककोंडी होते. मी जवळजवळ दोन दिवस या परिसरात होतो. पण साधा पोलीस हवालदारही येथे दिसला नाही. लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. या परिसरातील उमेदवारांनी रस्त्याच्या परिस्थिती तसेच वाहतूककोंडीबाबत ठोस निर्णय घ्यावेत ही अपेक्षा!

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Continue reading

नव्या महापालिका आयुक्तांचे स्वागत करताना…

मुंबईच्या पहिल्या महिला महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे मुंबईकरांच्या वतीने स्वागत करताना त्यांना मुंबईतल्या गिरगावातल्या 'हौदा'कडे बोट दाखवण्याची इच्छा नव्हती. परंतु त्या मुंबईच्या मेट्रो प्रकल्पाच्या प्रमुख होत्या. आजही तो अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडेच आहे, त्यामुळे हीच संधी घेतली म्हणाना. मुंबई...

लांब जटा.. टिळा-टोपी-माळा, अशा प्रतिमेला छेद देणारा भोंदू!

कॅप्टन नसलेल्या आणि इयत्ता दहावी नापास असलेल्या अशोक खरात नामक भोंदूबाबाच्या विविध कथांनी राज्यातील वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने सध्या भरून वाहत आहेत! तसे पाहिले तर आपल्या राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला बुवाबाजींनी ग्रासलेले आहे. कुठे आसाराम आहेत तर कुठे बाबा...

सत्यमेव जयते!

अलीकडे आपल्या सार्वजनिक व खासगी बँकामधील गैरप्रकारांची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. भविष्यात आणखीही येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे अशा सर्व प्रकरणाची एक खासियत आहे की, बँकेचे संबंधित अधिकारी वा संबंधित व्यवसायिक एकदा का न्यायालयात गेले की न्यायांचे 'दळण' सुरु...
Skip to content