Homeन्यूज ॲट अ ग्लांसनिवासी डॉक्टरांचा संप...

निवासी डॉक्टरांचा संप मागे!

पश्चिम बंगालमध्ये एका निवासी प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार व खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्याचा निर्णय झाल्यानंतर देशभरातल्या विविध रूग्णालयांमधल्या निवासी डॉक्टरांनी कालपासून सुरू केलेला संप मागे घेतल्याचे जाहीर केले आहे.

दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेने सार देश हादरला होता. प. बंगालमधल्या एका शासकीय रूग्णालयातल्या महिला प्रशिक्षणार्थी निवासी डॉक्टरवर बलात्कार करून नंतर तिची हत्त्या करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर प. बंगालमध्ये महिला सुरक्षित नाहीत, असा दावा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केला होता. त्यावर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आरोपील पकडण्याची मुदत जाहीर केली होती. तसे झाले नाही तर आपण या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याकरीता तयार आहोत, असे त्यांनी जाहीर केले होते.

त्यानंतर निवासी डॉक्टरांच्या राष्ट्रव्यापी संघटनेने काल संप पुकारला होता. त्यानुसार काल देशभर निवासी डॉक्टरांनी संप पुकारला. याच काळात आंदोलकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. या भेटीत नड्डा यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी घोषित केली. त्यानंतरनिवासी डॉक्टारांनी संप मागे घेण्याची घोषणा केली. त्यामुळे आजपासून महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये रूग्णांना उपचार मिळणार आहेत.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content