Homeन्यूज ॲट अ ग्लांसनिवासी डॉक्टरांचा संप...

निवासी डॉक्टरांचा संप मागे!

पश्चिम बंगालमध्ये एका निवासी प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार व खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्याचा निर्णय झाल्यानंतर देशभरातल्या विविध रूग्णालयांमधल्या निवासी डॉक्टरांनी कालपासून सुरू केलेला संप मागे घेतल्याचे जाहीर केले आहे.

दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेने सार देश हादरला होता. प. बंगालमधल्या एका शासकीय रूग्णालयातल्या महिला प्रशिक्षणार्थी निवासी डॉक्टरवर बलात्कार करून नंतर तिची हत्त्या करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर प. बंगालमध्ये महिला सुरक्षित नाहीत, असा दावा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केला होता. त्यावर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आरोपील पकडण्याची मुदत जाहीर केली होती. तसे झाले नाही तर आपण या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याकरीता तयार आहोत, असे त्यांनी जाहीर केले होते.

त्यानंतर निवासी डॉक्टरांच्या राष्ट्रव्यापी संघटनेने काल संप पुकारला होता. त्यानुसार काल देशभर निवासी डॉक्टरांनी संप पुकारला. याच काळात आंदोलकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. या भेटीत नड्डा यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी घोषित केली. त्यानंतरनिवासी डॉक्टारांनी संप मागे घेण्याची घोषणा केली. त्यामुळे आजपासून महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये रूग्णांना उपचार मिळणार आहेत.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content