Homeन्यूज अँड व्ह्यूजमतदानाच्या प्रमाणात सरकारमध्ये...

मतदानाच्या प्रमाणात सरकारमध्ये राजकीय पक्षांना प्रतिनिधित्व द्या!

ईलेक्टोरल बाँडमुळे सत्ताधारी पक्षाला सर्वाधिक निधी मिळाला. यातून निवडणुकीत एक विषम संधी निर्माण झाली. हे एका अर्थाने लोकशाहीच्या तत्त्वाच्या विरोधी आहे. यात कोठेही पारदर्शक्ता नव्हती. त्यामुळे हा कायदा रद्द होणे अटळच होते. पण याबरोबरच निवडणूक प्रक्रियेत अनेक सुधारणा करण्यात आल्या पाहिजेत. मतदानाच्या प्रमाणात सरकारमध्ये राजकीय पक्षांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. ईव्हीएम मशीन्सचा वापर करताना, त्याच्यात विश्वासार्हता आणण्यासाठी प्रक्रियेत आवश्यक सुधारणा आणल्या पाहिजेत, असे प्रतिपादन ॲड. प्रशांत भूषण यांनी पहिल्या कॉ. सुरेश धोपेश्वरकर  व्याख्यानमालेत बोलताना केले.

“माहितीचा अधिकार” चळवळीच्या एक अग्रणी कार्यकर्त्या अंजली भारद्वाज यांनी इलेक्टोरल बाँड या विषयात स्टेट बँकेने बजावलेल्या भूमिकेबद्दल तीव्र आक्षेप घेतला व याच्याशी संबंधित सर्व संस्थाना जबाबदार तसेच उत्तरदायी ठरविले पाहिजे असा आग्रह धरला.

अध्यक्षीय समारोप करताना माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यानी न्यायप्रणालीतील दिरंगाईवर टिप्पणी करताना असे सांगितले की ६०%वर दावे निकालात निघण्यासाठी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ लागतो. यात समाजातील कमकुवत घटकांचे नुकसान सगळ्यात जास्त होते. त्यांनी भारतीय लोकशाही टिकवायची असेल तर निवडणूक प्रक्रियेत व्यापक सुधारणा घडवून आणण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.

प्रारंभी संघटन सचिव, कॉ. एन. शंकर यांनी प्रास्ताविक केले, तर जनरल सेक्रेटरी कॉ. देवीदास तुळजापूरकर यांनी आभार व्यक्त केले. सभेचे सूत्रसंचालन कॉ. ललिता जोशी यांनी केले. याच समारंभात संघटनेच्या वतीने चालू करण्यात येणाऱ्या “मतदार जागृती अभियान”चे उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष  शैलेश गांधी यांनी सात पोस्टर्सचे अनावरण करून केले. या समारंभास बॅंक कर्मचाऱ्यांशिवाय समाजाच्या विविध घटकांतील लोक मोठ्या संख्येत उपस्थित होते. 

Continue reading

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयचे ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’!

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ देशाचे सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेशीच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशीदेखील संबंधित आहे. परदेशात...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...
Skip to content