Homeमुंबई स्पेशलमुंबई अग्निशमन दलातील...

मुंबई अग्निशमन दलातील ६ जवानांना ‘गुणवत्‍तापूर्ण सेवा पदक’ जाहीर

मुंबई अग्निशमन दलातील सहा अधिकारी – कर्मचारी यांना माननीय राष्ट्रपती महोदय यांचे गुणवत्तापूर्ण सेवा पदक काल जाहीर करण्‍यात आली. त्‍यात उपप्रमुख अग्निशमन अधिकारी अनिल वसंत परब, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी (परिमंडळ ३) हरिश्‍चंद्र रघू शेट्टी, विभागीय अधिकारी देवेंद्र शिवाजी पाटील, दुय्यम अधिकारी राजाराम निवृत्‍ती कुदळे, प्रमुख अग्निशामक किशोर जयराम म्‍हात्रे, प्रमुख अग्निशामक मुरलीधर अनाजी आंधळे यांचा समावेश आहे.

“शौर्यम् आत्मसंयमनम् त्याग: ” हे ब्रीदवाक्य असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलातील ६ जवानांना माननीय राष्‍ट्रपती महोदय यांचे ‘गुणवत्‍तापूर्ण सेवा पदक’ जाहीर झाले आहे. त्याचा संक्षिप्त तपशील पुढीलप्रमाणेः-

१) उप प्रमुख अग्निशमन अधिकारी अनिल वसंत परब, हे ३० वर्षे ६ महिने मुंबई अग्निशमन दलात कार्यरत आहेत. सद्यस्थितीत ते अग्निशमन दलातील प्रस्‍ताव विभाग व कार्यशाळेचा कार्यभार सांभाळत आहेत. त्‍यांना यापूर्वी विविध पुरस्कारांनी गौरविण्‍यात आले आहे.

२) उपप्रमुख अग्निशमन अधिकारी हरिश्‍चंद्र रघू शेट्टी हेदेखील मागील ३० वर्षे ६ महिने मुंबई अग्निशमन दलात कार्यरत आहेत. नैसर्गिक आपत्‍तींसह मानवनिर्मित आपत्‍तीतदेखील त्‍यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सद्यस्थितीत मरोळ प्रादेशिक समादेश केंद्राचा कार्यभार सांभाळत आहेत. त्‍यांना यापूर्वी विविध संस्‍था – संघटनांकडून गौरविण्‍यात आले आहे.

अग्नी

३) विभागीय अधिकारी देवेंद्र शिवाजी पाटील हे गत ३२ वर्षे मुंबई अग्निशमन दलात कार्यरत आहेत. सद्यस्थितीत मुंबई अग्निशमन दलातील विभागीय अग्निशमन अधिकारी (प्रशासन) या पदावर कार्यरत आहेत. त्‍यांना महानगरपालिका आयुक्‍तांच्‍या उत्‍कृष्‍ट अग्निशामक पारितोषिकाने यापूर्वी तीनवेळा गौरविण्‍यात आले आहे. महाराष्‍ट्र्र शासनानेदेखील त्‍यांना प्रशस्‍तीपत्रक देऊन गौरविले आहे.

४)  भायखळा येथील अग्निशमन केंद्रात कार्यरत असलेले दुय्यम अधिकारी राजाराम निवृत्‍ती कुदळे हे ३१ वर्षे ४ महिने मुंबई अग्निशमन दलात कार्यरत आहेत. त्‍यांना खाते अंतर्गत विविध पारितोषिकांनी गौरविण्‍यात आले आहे.

अग्नी

५) प्रमुख अग्निशामक (लिडिंग फायरमन) किशोर जयराम म्‍हात्रे हे सध्‍या दादर अग्निशमन केंद्रात कार्यरत आहेत. त्‍यांनी मुंबई अग्निशमन दलात ३२ वर्षे ९ महिने सेवा बजाविली आहे. त्‍यांनादेखील खाते अंतर्गत विविध पारितोषिकांनी गौरविण्‍यात आले आहे.


अग्नी

६) विक्रोळी येथील अग्निशमन केंद्रात कार्यरत असलेले प्रमुख अग्निशामक (लिडिंग फायरमन) मुरलीधर अनाजी आंधळे हे २७ वर्षे ९ महिने मुंबई अग्निशमन दलात कार्यरत आहेत. त्‍यांना खाते अंतर्गत विविध पारितोषिकांनी गौरविण्‍यात आले आहे.

Continue reading

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयचे ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’!

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ देशाचे सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेशीच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशीदेखील संबंधित आहे. परदेशात...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...
Skip to content