Homeहेल्थ इज वेल्थलसीच्या एका डोसने...

लसीच्या एका डोसने मिळणार दोन जीवांना सुरक्षितता!

कोविड-19च्या दुसऱ्या लाटेत गरोदर महिलांच्या वाढत्या मृत्यूमुळे यादिशेने चर्चा सुरू झाली. दुसऱ्या लाटेत, कोविड-19 बाधित गरोदर महिलांच्या मृत्यूचे प्रमाण, पहिल्या लाटेच्या तुलनेत दुप्पट ते तिप्पट होते. अशा परिस्थितीत कोविड-19 लसीचा लाभ गरोदर महिलानांही मिळायला हवा असे जाणवले. गरोदर महिलांच्या बाबतीत हा दोन जीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असतो. एक म्हणजे ती माता आणि दुसरा जीव म्हणजे गर्भातील बाळ. म्हणूनच देशाने गरोदर महिलांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला, असे लसीकरणाबाबतच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या कोविड-19 कार्यकारी गटाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी डीडी न्यूजशी संवाद साधताना सांगितले.

या लसीमुळे या महिलांना अधिक लाभ होईल. कोरोनाची भीती आणि चिंता यापासून त्या मुक्त राहतील. गरोदर महिलांच्या लसीकरणामुळे तिच्या उदरात वाढणारा गर्भही यापासून सुरक्षित ठेवता येऊ शकतो. गरोदर महिलेमध्ये प्रतिकारक्षमता विकसित झाल्यास तिच्या गर्भालाही ही सुरक्षितता प्राप्त होते. लसीचा प्रभाव आणि मातेच्या शरीरात निर्माण झालेली प्रतिकारक्षमता, बालकाच्या जन्मापर्यंत त्याच्याकडे राहते, असेही ते म्हणाले.

गरोदर महिलांसाठी लसीची सुरक्षितता

गरोदर महिलांचे लसीकरण करायला हवे, कारण केवळ मातेच्या शरीरातच नव्हे तर गर्भामध्येही यामुळे प्रतिकारक्षमता निर्माण होते, असा विचार संपूर्ण जगभरात आहे. एकंदरीत आपल्या लसी सुरक्षित आहेत. युरोप आणि उत्तर अमेरिका यासारख्या पाश्चिमात्य देशात mRNA लस दिली जात आहे. गरोदर महिलांचे लसीकरण केले जात आहे. ही बाब आणि  आकडेवारी लक्षात घेऊन आपल्या देशात गरोदर महिलांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पहिल्या तीन महिन्यांत बाळाचे शरीर आकार घेत असल्याने या काळात गरोदर महिलांना लस देण्याबाबत काही जणांनी शंका आणि भीती व्यक्त केली होती. या शंकेचे निरसन करताना डॉ अरोरा यांनी, गरोदर  महिला आणि गर्भासाठीही लस सुरक्षित असल्याचे सांगत त्यांना आश्वस्त केले. आपल्या लसीमध्ये, जिवंत विषाणू नाही, जो संसर्गाला कारणीभूत ठरू शकेल. त्यामुळे अशी भीती निरर्थक आहे. लसीमुळे मातेच्या उदरातल्या गर्भावर कोणताही वाईट परिणाम होईल असे दिसत नाही असे ते म्हणाले.

लसी

सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून लस घेणाऱ्या गरोदर महिलेच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्यात येईल. देशात लस घेणाऱ्या गरोदर महिलांना, अस्वस्थतेच्या चिन्हाबाबत नेटवर्कच्या माध्यमातून  देखरेख ठेवण्यात येईल. गर्भाच्या वाढीवरही लक्ष ठेवण्यात येईल. यातून आपल्या माता, भगिनी लसीकरणानंतर संपूर्णपणे सुरक्षित असल्याची खातरजमा होईल, असे ते म्हणाले.

गरोदर महिलांना लसीकरणानंतर जाणवणाऱ्या साईडइफेक्टबाबत बोलताना डॉ. अरोरा म्हणाले की, 10 लाख महिलांमध्ये एका महिलेला रक्तस्त्राव किंवा गुठळी निर्माण झाल्याची समस्या अनुभवाला आली आहे. तीव्र डोकेदुखी, डोकेदुखीसह उलटी, उलटीच्या भावनेसह पोटदुखी किंवा श्वासाला त्रास अशी लक्षणे दिसू शकतात. ही तीन ते चार लक्षणे आढळून येऊ शकतात. सामान्यतः लसीकरणानंतर तीन ते चार आठवड्याच्या कालावधीत ही लक्षणे दिसून येऊ शकतात. अशावेळी गरोदर महिलेच्या कुटुंबियांनी त्या महिलेला, जिथे तिचे लसीकरण झाले त्या रुग्णालयात त्वरित न्यावे. रुग्णालयात याचे कारण शोधून तिला आवश्यक ते उपचार पुरवता येतील.

गरोदर महिला लसीची मात्रा कधी घेऊ शकते?

गरोदर महिला कधीही लस घेऊ शकते. गरोदर असल्याचे निदान झाल्यापासून कोणत्याही वेळी या महिलांना कोविड-19 लस देता येऊ शकते. पहिल्या तीन महिन्यांत, दुसऱ्या किंवा तिसऱ्या, तीन महिन्यांत लस दिल्याने काहीही फरक पडत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Continue reading

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...

लाभ घ्या आयुष्मान भारत आणि म. फुले जनआरोग्य योजनेचा

महाराष्ट्रात ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना’ एकत्रित राबविण्यात येत असून राज्यातल्या सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सर्व लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड राज्यातल्या आशा कर्मचारी, आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचारी तसेच स्वस्त धान्य दुकानचालक यांच्यामार्फत तयार केले...

एमआयजी क्रिकेट क्लबची राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

मुंबईतल्या एमआयजी क्रिकेट क्लबच्या वतीने तिसरी महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा येत्या 27 ते 29 सप्टेंबर 2025दरम्यान एमआयजी क्रिकेट क्लब, कलानगर वांद्रे (पाश्चिम), मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन विभागात खेळविण्यात येणाऱ्या या...
Skip to content