Homeबॅक पेजईव्हीएमशिवाय पंतप्रधान नरेंद्र...

ईव्हीएमशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी जिंकूच शकत नाहीत!

ईव्हीएमशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक जिंकूच शकत नाहीत. ईव्हीएममध्ये मशीनमध्ये काही नाही. त्यातल्या कागदावर मते असतात. या कागदाची मोजणी होत नाही. आम्ही निवडणूक आयोगाला या कागदांची मोजदाद करायला सांगितली तर ते तयार नाहीत. इथेच सारी गोम आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज मुंबईतल्या शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत केली.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समापनानिमित्त इंडिया आघाडीच्या सभेत ते बोलत होते. आमची लढाई नरेंद्र मोदींशी नाही तर त्यांना चालवणाऱ्या शक्तीच्या विरोधात आहे. ही शक्ती मोदींना रोज काय करायचे ते सांगते. आज हे बोला, उद्या ते करा, परवा पाण्याखाली बसा.. तसे ते करतात. या शक्तीविरोधात आपल्याला एकजुटीने लढायचे आहे, असे ते म्हणाले.

इलेक्ट्रोलर बॉण्ड म्हणजे मुंबईतल्या रस्त्यांवरील फेरीवल्यांकडून गोळा करण्यात येणाऱ्या हफ्तावसुलीचे राष्ट्रीय स्वरूप आहे. चार प्रकारे ही खंडणीवसुली केली जाते. कंत्राटे द्या आणि मग खंडणी गोळा करा. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स मागे लावा आणि खंडणी गोळा करा. बोगस कंपन्या तयार करून खंडणी जमवा आणि खंडणी गोळा करा व नंतर कंत्राटे द्या, अशा या पद्धती आहेत, असे ते म्हणाले.

या सभेत बोलताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी अब की बार भाजपा तडीपारचा नारा दिला. नरेंद्र मोदींना ते व त्यांच्या खुर्चीपलीकडे परिवार आहे कुठे? कशाला हवेत ४०० पार? त्यांना घटना बदलायची आहे. भारत सरकार म्हणण्याऐवजी ते आता म्हणतात मोदी सरकार.. का देशाचे नावही आता बदलणार आहात का, असा सवालही त्यांनी केला.

प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात इलेक्ट्रोलर बॉण्डमध्ये बोगस कंपन्यांचा वापर झाल्याबद्दल जाब विचारण्याचे आवाहन केले. ज्या कंपनीचा फायदाच २०० कोटींचा आहे ती कंपनी भाजपाला १३०० कोटींचा निधी देऊ कसा शकते, असा सवाल त्यांनी केला.

शरद पवार, तेजस्वी यादव, मेहबुबा मुफ्ती, फारूख अब्दुल्ला, कल्पना सोरेन, एम. के. स्टॅलिन आदींची यावेळी भाषणे झाली.

Continue reading

मुंबई विमानतळावर 11 कोटींचा माल जप्त!

सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये 11 कोटींहून अधिक किंमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड), परदेशी वन्यजीव आणि सोने जप्त केले. सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेतल्या झोन-3 च्या अधिकाऱ्यांनी विमानतळ आयुक्तालय इथे केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये पहिल्या प्रकरणात 9.662 किलोग्रॅम...

‘अभिजात साहित्याचे अक्षरविश्व’ प्रकाशित

सुप्रसिद्ध साहित्यिक राजीव श्रीखंडे लिखित आणि ग्रंथालीच्या वतीने प्रकाशित 'अभिजात साहित्याचे अक्षरविश्व', या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, विजय कुवळेकर, संजीवनी खेर आणि दिनकर गांगल यांच्या हस्ते मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात नुकतेच झाले. या पुस्तकात १५३२ ते २००१ या कालावधील जगभरातील साहित्यकृतींचा...

मुंबईत पालिकांच्या शाळेत गणित, इंग्रजीसाठी स्मार्ट तंत्रज्ञान

मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी यासारख्या विषयाची गोडी लागावी तसेच विषयाच्या संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेणे शक्य व्हावे यासाठी पालिकेच्‍या शिक्षण विभाग आणि संपर्क फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपर्क स्मार्ट शाळा शिक्षक प्रशिक्षण आयोजित करण्यात...
Skip to content