Homeचिट चॅटतब्बल १५ वर्षांनंतर...

तब्बल १५ वर्षांनंतर राष्ट्रपती करताहेत रेल्वेप्रवास!

राष्ट्रपती राम नाथ कोविंद आज दिल्लीच्या सफदरजंग रेल्वेस्थानकातून खास रेल्वेगाडीतून कानपूरला रवाना झाले. तब्बल १५ वर्षांनंतर देशाचे राष्ट्रपती रेल्वेने प्रवास करत आहेत. आपल्या सात दशकांतल्या रम्य आठवणींसह राष्ट्रपती कोविंद उत्तर प्रदेशातल्या आपल्या परौन्ख, या जन्मगावी भेट देणार आहेत.

राष्ट्रपतींची ही खास रेल्वेगाडी गाडी कानपूरमधील झिंझाक आणि कानपूर देहातच्या रुरा असे दोन थांबे घेईल. तेथे राष्ट्रपती आपल्या शालेय जीवनातील आणि त्यांच्या सामाजिक सेवेच्या सुरुवातीच्या दिवसांमधील जुन्या परिचितांशी संवाद साधतील.

हे दोन थांबे राष्ट्रपतींचे जन्मस्थान असलेल्या कानपूर देहातच्या परौन्ख गावाजवळ असून  तेथे त्यांच्या सन्मानार्थ २७ जूनला दोन कार्यक्रम होणार आहेत. रेल्वेगाडीत बसल्यावर राष्ट्रपती बालपणापासून देशातील सर्वोच्च पदावर पोहोचण्यापर्यंतच्या सात दशकांमधील आठवणी सोबत घेऊन प्रवास करत आहेत.

राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते प्रथमच आपल्या जन्मस्थळी भेट देत आहेत.  या ठिकाणी यापूर्वी भेट द्यायची त्यांची इच्छा होती. परंतु कोरोना महामारीमुळे ते शक्य झाले नाही. त्यांनी निवडलेल्या रेल्वे मार्गाने प्रवासाची पद्धत अनेक राष्ट्रपतींच्या परंपरेनुसार आहे, ज्यांनी देशाच्या निरनिराळ्या भागातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी रेल्वे प्रवास केला होता.

१५ वर्षांनंतर राष्ट्रपतीपदावरील व्यक्ती रेल्वे प्रवास करणार आहे. यापूर्वी २००६ साली तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी भारतीय लष्कर अकादमीत (आयएमए) कॅडेट्सच्या पासिंग आउट परेडमध्ये भाग घेण्यासाठी दिल्ली-देहरादून, असा विशेष रेल्वेने प्रवास केला होता.

इतिहासातील नोंदी दाखवतात की, देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी अनेकदा रेल्वे प्रवास केला होता. राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी बिहार दौर्‍यादरम्यान सिवान जिल्ह्यातील त्यांचे जन्मस्थान झिरादेई येथे भेट दिली. ते छपरा येथून झिरादेईला जाण्यासाठी राष्ट्रपतींच्या विशेष रेल्वेगाडीत बसले आणि त्यांनी तिथे तीन दिवस वास्तव्य केले. त्यांनी रेल्वेने देशभर प्रवास केला.

डॉ. प्रसाद यांच्यानंतरच्या राष्ट्रपतींनीदेखील देशातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले. २८ जूनला रोजी राष्ट्रपती कोविंद कानपूर स्थानकातून रेल्वेगाडीतून लखनौला दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी जातील. २९ जूनला ते विशेष विमानाने नवी दिल्लीला परतणार आहेत.

Continue reading

हरमित सिंग ठरला ‘खासदार श्री’चा किंग!

मुंबईच्या शरीरसौष्ठवाची अस्सल श्रीमंती दाखवणारी ३००पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंमध्ये रंगलेली जोरदार चुरस... मुंबईच्या फिटनेस संस्कृतीचा क्रीडासोहळा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची अभूतपूर्व गर्दी आणि केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केलेली लाख मोलाच्या बक्षिसांची उधळण, यामुळे ‘खासदार श्री शरीरसौष्ठव स्पर्धे’ने...

क्रिकेट विश्वचषक जिंकलाः प्रतिका, स्नेह, रेणुकाला रेल्वेकडून बढती!

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू प्रतिका रावत, स्नेह राणा आणि रेणुका सिंह ठाकूर यांना भारतीय रेल्वेकडून विशेष कार्य अधिकारी (क्रीडा) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या नामवंत महिला क्रिकेटपटूंना, विशेष बाब म्हणून (Out-of-Turn Promotion) पदोन्नती देण्यात आली...

मुंबईत जल मेट्रो प्रकल्प राबवा!

मुंबई शहर, पूर्व-पश्चिम विभागातील झोपडपट्ट्यांचा झपाट्याने विकास होत असल्याने त्या-त्या भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामानाने येथील अंतर्गत रस्ते तसेच पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत नसल्याने मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी...
Skip to content