Homeचिट चॅटतब्बल १५ वर्षांनंतर...

तब्बल १५ वर्षांनंतर राष्ट्रपती करताहेत रेल्वेप्रवास!

राष्ट्रपती राम नाथ कोविंद आज दिल्लीच्या सफदरजंग रेल्वेस्थानकातून खास रेल्वेगाडीतून कानपूरला रवाना झाले. तब्बल १५ वर्षांनंतर देशाचे राष्ट्रपती रेल्वेने प्रवास करत आहेत. आपल्या सात दशकांतल्या रम्य आठवणींसह राष्ट्रपती कोविंद उत्तर प्रदेशातल्या आपल्या परौन्ख, या जन्मगावी भेट देणार आहेत.

राष्ट्रपतींची ही खास रेल्वेगाडी गाडी कानपूरमधील झिंझाक आणि कानपूर देहातच्या रुरा असे दोन थांबे घेईल. तेथे राष्ट्रपती आपल्या शालेय जीवनातील आणि त्यांच्या सामाजिक सेवेच्या सुरुवातीच्या दिवसांमधील जुन्या परिचितांशी संवाद साधतील.

हे दोन थांबे राष्ट्रपतींचे जन्मस्थान असलेल्या कानपूर देहातच्या परौन्ख गावाजवळ असून  तेथे त्यांच्या सन्मानार्थ २७ जूनला दोन कार्यक्रम होणार आहेत. रेल्वेगाडीत बसल्यावर राष्ट्रपती बालपणापासून देशातील सर्वोच्च पदावर पोहोचण्यापर्यंतच्या सात दशकांमधील आठवणी सोबत घेऊन प्रवास करत आहेत.

राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते प्रथमच आपल्या जन्मस्थळी भेट देत आहेत.  या ठिकाणी यापूर्वी भेट द्यायची त्यांची इच्छा होती. परंतु कोरोना महामारीमुळे ते शक्य झाले नाही. त्यांनी निवडलेल्या रेल्वे मार्गाने प्रवासाची पद्धत अनेक राष्ट्रपतींच्या परंपरेनुसार आहे, ज्यांनी देशाच्या निरनिराळ्या भागातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी रेल्वे प्रवास केला होता.

१५ वर्षांनंतर राष्ट्रपतीपदावरील व्यक्ती रेल्वे प्रवास करणार आहे. यापूर्वी २००६ साली तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी भारतीय लष्कर अकादमीत (आयएमए) कॅडेट्सच्या पासिंग आउट परेडमध्ये भाग घेण्यासाठी दिल्ली-देहरादून, असा विशेष रेल्वेने प्रवास केला होता.

इतिहासातील नोंदी दाखवतात की, देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी अनेकदा रेल्वे प्रवास केला होता. राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी बिहार दौर्‍यादरम्यान सिवान जिल्ह्यातील त्यांचे जन्मस्थान झिरादेई येथे भेट दिली. ते छपरा येथून झिरादेईला जाण्यासाठी राष्ट्रपतींच्या विशेष रेल्वेगाडीत बसले आणि त्यांनी तिथे तीन दिवस वास्तव्य केले. त्यांनी रेल्वेने देशभर प्रवास केला.

डॉ. प्रसाद यांच्यानंतरच्या राष्ट्रपतींनीदेखील देशातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले. २८ जूनला रोजी राष्ट्रपती कोविंद कानपूर स्थानकातून रेल्वेगाडीतून लखनौला दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी जातील. २९ जूनला ते विशेष विमानाने नवी दिल्लीला परतणार आहेत.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content