Homeएनसर्कलपोप फ्रान्सिस यांच्यावरील...

पोप फ्रान्सिस यांच्यावरील अंत्यसंस्कारात राष्ट्रपती मुर्मू सहभागी

रोमन कॅथोलिक ख्रिश्चन समाजाचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रन्सिस यांचे २१ एप्रिलला वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले. काल रोममधल्या व्हॅटिकन सिटीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यावेळी व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर स्क्वेअर येथे पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराच्या प्रार्थनेत सहभागी झाल्या. पोप यांच्यावरील अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या अधिकृत भारतीय शिष्टमंडळाचा भाग असलेले केंद्रीय संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू, अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन आणि गोवा विधानसभेचे उपाध्यक्ष जोशुआ डिसुझा हेही यावेळी उपस्थित होते.

पोप फ्रान्सिस यांची समाजसेवा कायम स्मरणात राहील – पंतप्रधान मोदी

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांच्यावरील अंत्यसंस्काराच्या निमित्ताने एक्सवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, भारतीय जनतेच्या वतीने राष्ट्रपतीजींनी परमपूज्य पोप फ्रान्सिस यांना आदरांजली वाहिली आहे. पोप फ्रान्सिस यांनी समाजासाठी केलेली सेवा, जगाच्या कायम स्मरणामध्‍ये राहील. जग त्यांच्या समाजसेवेचे कायम स्मरण करेल.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content