Homeपब्लिक फिगरराष्ट्रपती मुर्मूंनी बेनेश्वर...

राष्ट्रपती मुर्मूंनी बेनेश्वर धाममध्ये केले आदिवासी महिलांना संबोधन

राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी काल (14 फेब्रुवारी, 2024) राजस्थानमधील बेनेश्वर धाम येथे राजस्थानच्या विविध बचतगटांशी संबंधित आदिवासी महिलांच्या मेळाव्याला संबोधित केले.

भारताने आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला आहे. भारतातील प्रत्येक घटक आत्मनिर्भर झाल्यावरच भारत आत्मनिर्भर होऊ शकेल असे राष्ट्रपतींनी यावेळी उद्धृत केले. आत्मनिर्भरतेला चालना दिल्याबद्दल त्यांनी बचतगटांचे आणि त्यांच्याशी निगडित प्रत्येकाचे कौतुक केले. बचतगट केवळ खेळते भांडवलच देत नाहीत तर मनुष्यबळाचे भांडवल आणि सामाजिक भांडवल उभारण्याचे प्रशंसनीय कार्य करत आहेत, असे त्या म्हणाल्या.

आदिवासी समाजाकडून समाजातील इतर घटकांना खूप काही बोध घेता येतो. आदिवासी समाजाने स्वयंप्रशासनाची उत्तम उदाहरणे घालून दिली आहेत. निसर्गाशी एकरूप होऊन आनंदाने कसे जगायचे हे आपण त्यांच्याकडून शिकू शकतो. निसर्गाची हानी न करता कमीतकमी संसाधनांसह जगणे आपण त्यांच्याकडून शिकू शकतो. महिला सक्षमीकरणाबाबतही आपण जाणून घेऊ शकतो असे मत राष्ट्रपतींनी व्यक्त केले.

महिलांच्या नेतृत्त्वाखालील विकासाची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी संपूर्ण समाजाने प्रयत्न केले पाहिजेत. महिलांमध्ये शिक्षण आणि कौशल्य विकासाला चालना दिली पाहिजे. असे केल्याने महिला देशाच्या आणि जगाच्या प्रगतीत समान भागीदार बनू शकतील. भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात महिला आघाडीची भूमिका बजावतील, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. त्यांच्या यशाच्या बळावरच भारताचे भविष्य उज्ज्वल होईल, असे मुर्मू म्हणाल्या.

राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content