Homeकल्चर +'सुशीला-सुजीत'मध्ये तब्बल पाच...

‘सुशीला-सुजीत’मध्ये तब्बल पाच भूमिका निभावणार प्रसाद ओक!

एखादा कलाकार एखाद्या चित्रपटात फारफार तर दुहेरी भूमिका साकारताना दिसतो. पण आगामी सुशीला-सुजीत, या चित्रपटामध्ये प्रसाद ओक एक, दोन नव्हे तर तब्बल पाच भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रसाद ओक या चित्रपटाचं दिग्दर्शन तर करणार आहेच, पण सोबतीने बाकी काही खास भूमिकादेखील निभावताना दिसणार आहे.

आजवर प्रसादने मराठी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट, दमदार चित्रपट तर दिले आहेतच, पण आगामी सुशीला-सुजीतची प्रेक्षकांना अधिक उत्सुकता आहे. या चित्रपटात प्रसाद करत असलेल्या तब्बल पाच भूमिका नक्की कोणत्या? तर प्रसाद या चित्रपटाचा कॅप्टन ऑफ द शीप म्हणजे दिग्दर्शक आहे. सोबतीला तो या चित्रपटात एक अतरंगी भूमिका साकारतोय! चित्रपटाची कथा प्रसादचीच आहे. या चित्रपटाचा निर्मातासुद्धा तोच आहे आणि लास्ट बट नॉट लिस्ट, या चित्रपटात प्रसादने एक सुंदर गाणंदेखील गायलं आहे.

एवढ्या सगळ्या भूमिका आणि त्यासुद्धा एकाच चित्रपटासाठी निभावणं ही खरंतर तारेवरची कसरत म्हणावी. पण प्रसादने या सगळ्या भूमिका एकदम चोख पार पाडल्या आहेत, ज्या तुम्हा सगळ्यांना येत्या 18 एप्रिलला सिनेमागृहात बघायला मिळतील. प्रसाद प्रत्येक सिनेमात काही न काहीतरी वेगळा प्रयत्न करून प्रेक्षकांना मोहित करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळेच आता प्रेक्षकांना सुशीला-सुजीतमध्ये काय वेगळं बघायला मिळणार याची उत्सुकता लागली आहे.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content