Monday, May 12, 2025
Homeचिट चॅटप्रबोधन विद्या निकेतनमध्ये...

प्रबोधन विद्या निकेतनमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

मुंबईच्या मालाड येथील प्रज्ञा प्रबोधन संस्था संचालित प्रबोधन विद्या निकेतन शाळेत १५ जूनला शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सरस्वती पूजन, प्रार्थना करून फुले आणि चॉकलेट्स देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी हर्षला राऊत यांनी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करून जीवनात शिक्षण व शिस्तीचे महत्त्व उत्तमरीत्या पटवून दिले. आकांक्षा माने यांनी प्रबोधन विद्या निकेतन या शिक्षण प्रवाहाबाहेर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी झटणाऱ्या शाळेचा इतिहास तसेच शिक्षकांची विद्यार्थ्यां विषयीची तळमळ, आस्था विद्यार्थ्यांना पटवून दिली. मनिषा घेवडे यांनी आयुष्यात एकाग्रता आणि चिकाटी यांचे महत्त्व विविध उदाहरणांनी पटवून दिले आणि ध्यानाचे प्रात्यक्षिकही घेतले.

प्रबोधन

जून महिना आला की चाहूल लागते  शाळा सुरू होण्याची. पूर्वी १३ जून रोजी सुरू होणारी शाळा अलिकडे १५ जून रोजी सुरू होत असते. शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षक विद्यार्थ्यांचे स्वागत करत असतात. त्यांना विविध भेटवस्तू, स्वागताची रांगोळी, भोजन देऊन, शाळेच्या पहिल्या दिवशी विविध खेळ, स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून शाळेची आवड निर्माण होते, त्यालाच शाळा प्रवेशोत्सव असे म्हटले जाते.

आसपासच्या परिसरातील होतकरू, शिकण्याची इच्छा असणारे जे विद्यार्थी शाळेच्या तसेच शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर आहेत, त्यांनी जरूर संपर्क साधावा असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका प्रविणा वाडेकर तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष अशोक पटेल, सचिव विजय मांडाळकर आणि खजिनदार प्रभाकर देसाई यांनी केले.

Continue reading

मंगळवारी ठाण्याच्या डॉ. घाणेकर नाट्यगृहात ‘प्री-वेडिंग’!

लव मॅरेज की अरेंज मॅरेज? लग्न करून पाहवं की लग्न करूच नये? पती-पत्नी यांचं नातं कल्पनेत आणि प्रत्यक्षात कसं असतं? अलीकडचे लग्नाच्या वयाचे तरुण-तरुणी या गुंत्यामध्ये अडकलेले असतात. नेमकं काय करावं? त्यांचा गोंधळ उडतो. निर्णय होत नाही. वय वाढत जातं.. आणि मग ठरतं.. 'प्री-वेडिंग'! .....

अडसूळ ट्रस्ट राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत एमडीसी अजिंक्य

महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत विनाशुल्क शालेय खेळाडूंच्या राज्यस्तरीय सुपर लीग कॅरम स्पर्धेत राज्य ख्यातीचे कॅरमपटू रत्नागिरीची स्वरा मोहिरे, सार्थक केरकर, अमेय जंगम, वेदिका पोमेंडकर यांच्या एमडीसी ज्वेलर्स संघाने अजिंक्यपद पटकाविले. चुरशीच्या अंतिम सामन्यात...

भारताविरोधात पाकिस्तान युद्ध पुकारणार?

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना उखडून टाकण्यासाठी भारताने सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर अजूनही चालूच असून पाकिस्तानचा एकूण पवित्रा पाहता लवकरच पाक भारताविरोधात युद्ध पुकारण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्या राष्ट्राविरोधात युद्ध पुकारण्याचे पाप आपल्या माथी येऊ नये, मात्र युद्ध पुकारण्यासाठी पाकला भाग...
error: Content is protected !!
Skip to content