Homeचिट चॅटपंतप्रधान मोदींची उद्या...

पंतप्रधान मोदींची उद्या ‘परिक्षा पे चर्चा’!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिक्षा पे चर्चा या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणाऱ्या विशेष कार्यक्रमाची चौथी आवृत्ती कोविड-19 नियमावलीच्या अनुषंगाने प्रथमच दूरसंवाद पद्धतीने होणार आहे.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बुधवारी 7 एप्रिल 2021 रोजी संध्याकाळी 7 वाजता दूरदर्शन वाहिन्या तसेच डिजिटल माध्यमातून हिंदी व इतर प्रादेशिक भाषांमधून होईल. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे सलग चौथ्या वर्षी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले जात आहे.

नववी ते बारावीतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी 17 फेब्रुवारी ते 14 मार्च 2021 या कालावधीत https://innovateindia.mygov.in/ppc-2021/ या संकेतस्थळावर विविध विषयांवरील ऑनलाईन सृजनशील लेखन स्पर्धा घेतली होती. सृजनशील लेखन स्पर्धेत 10.5 लाख विद्यार्थी, 2.6 लाख शिक्षक व 92 हजार पालकांनी उत्साहाने भाग घेतला. भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी 60% हून जास्त विद्यार्थी नववी व दहावीचे आहेत. ‘परिक्षा पे चर्चा’ पूर्व सृजनशील लेखन स्पर्धेत प्रथमच 81 इतर देशातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या चौथ्या भागासाठी जवळपास 14 लाख जणांनी  नावनोंदणी केली आहे.  परिक्षा पे चर्चा हा मुख्य कार्यक्रम दूरदर्शन वाहिन्या तसेच  EduMinofIndia, narendramodi, pmoindia, pibindia, DoordarshanNational, MyGovIndia, DDNews, RajyaSabhaTV, SwayamPrabha ही डिजिटल माध्यमे त्यांच्या फेसबुक आणि युट्युब वाहिन्यांवर 7  एप्रिल 2021 रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून प्रसारित करतील. #ExamWarriors #PPC202 हे हॅशटॅग मोठ्या प्रमाणावर समाजमाध्यमांमध्ये वापरले जात आहेत. 

परिक्षेचा उत्सव करणाऱ्या ‘परिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमासाठी देश एकत्र येईल, ज्यामुळे देशभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना पंतप्रधानांच्या उभारी देणाऱ्या शब्दांचा लाभ घेता येईल.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content