Wednesday, September 18, 2024
Homeकल्चर +‘पवनाकाठचा धोंडी’ व...

‘पवनाकाठचा धोंडी’ व ‘ताई तेलीण’ संग्रहालयात!

एनएफएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने 16 एमएम आणि 35 एमएमच्या 89 चित्रपटांच्या प्रतींची आपल्या खजिन्यात भर घातली आहे. मराठी चित्रसृष्टीच्या 1950 ते 1970 या सुवर्ण काळातल्या अनेक चित्रपटांसह महत्त्वाच्या काही हिंदी चित्रपटांचाही यामध्ये समावेश आहे. संग्रहालयाला 23 कृष्णधवल चित्रपट प्राप्त झाल्याने भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण युगातला अनमोल ठेवा प्राप्त झाला आहे. यात 1953मधला ताई तेलीण आणि 1966मधला पवनाकाठचा धोंडी, या अतिशय दुर्मिळ चित्रपटांचा समावेश आहे.

मराठी चित्रपटांच्या सुवर्ण काळातले महत्त्वाचे चित्रपट आणि गाजलेले काही हिंदी चित्रपट प्राप्त झाल्याने आनंद झाल्याची भावना एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांनी व्यक्त केली. 1953मधला ताई तेलीण आणि 1966मधला पवनाकाठचा धोंडी हे अतिशय दुर्मिळ चित्रपट लुप्त झाले आहेत असे वाटत असतानाच हे चित्रपट एनएफएआयच्या खजिन्यात आले आहेत, याचा अतिशय आनंद झाला आहे. चित्रपट संस्कृतीच्या अनमोल ठेव्याचे जतन करण्यासाठी चित्रपट निर्माते, वितरक आणि वैयक्तिक संग्रह करणाऱ्या व्यक्तींनी, चित्रपट आणि चित्रपट प्रसिद्धीचे साहित्य घेऊन पुढे येण्याचे आवाहन मगदूम यांनी केले.

‘ताई तेलीण’मध्ये शांता आपटे

1953मधला ताई तेलीण आणि 1966मधला पवनाकाठचा धोंडी हे अतिशय दुर्मिळ चित्रपट लुप्त झाले आहेत असे समजले जात असतानाच हे चित्रपट प्राप्त झाले आहेत. ताई तेलीण, हा आर्यन फिल्म कंपनीचा ऐतिहासिक चित्रपट असून शांत आपटे, सुधा आपटे, नलिनी बोरकर आणि झुंजारराव पवार या प्रसिद्ध कलाकारांच्या यात भूमिका आहेत. केपी भावे आणि अंतो नरहरी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला मास्टर कृष्णराव यांचे संगीत होते.

उषा मंगेशकरांचा ‘पवनाकाठचा धोंडी’

अनंत ठाकूर यांचा ‘पवनाकाठचा धोंडी’ हा आणखी एक महत्त्वाचा चित्रपट असून 1966मध्ये या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावला होता. दिग्दर्शक म्हणून मराठीमधला हा त्यांचा पहिला चित्रपट होता. ठाकूर यांनी राज कपूर यांची भूमिका असलेला चोरी चोरी, या 1956 मधल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. पवनाकाठचा धोंडी, या चित्रपटाची निर्मिती उषा मंगेशकर यांनी श्री महालक्ष्मी बॅनर अंतर्गत केली. जयश्री गडकर, चंद्रकांत आणि सुर्यकांत या प्रख्यात कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. प्रत्यक्ष जीवनात भाऊ-भाऊ असणारे चंद्रकांत आणि सूर्यकांत यांनी पडद्यावरही भावांची भूमिका साकारली होती, असा प्रसंग तसा दुर्मिळच म्हणावा लागेल.

पडद्यावर भावंडं म्हणून भूमिका साकारणे हा आपणा दोघा भावंडांसाठी भावनिक क्षण असल्याचे स्मरण सूर्यकांत यांनी एनएफएआयच्या श्राव्य इतिहास प्रकल्पाचा भागात केले. प्रसिद्ध लेखक गो. नी. दांडेकर यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटाला हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत होते.

‘देव पावला’ही संग्रहालयात

या संग्रहातला आणखी एक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे राम गबाले यांचा 1950मधला ‘देव पावला’. दामुअण्णा मालवणकर आणि विष्णूपंत जोग यांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. पुण्यातल्या प्रभात स्टुडिओमध्ये याचे चित्रिकरण झाले होते.

1955मधला राजन कुमार यांचा भाऊबीज, माधव शिंदे यांचा अंतरीचा दिवा (1960), दत्ता धर्माधिकारी यांचा सुभद्राहरण (1963), वसंत पिंतर यांचा बारा वर्षे सहा महिने तीन दिवस(1967), राज दत्त यांचा धाकटी बहिण (1970), केशव तोरो यांचा पुढारी (1972), गोविंद कुलकर्णी यांचा बन्या बापू (1977), राजा बारगीर यांचा दीड शहाणे (1979), सुशील गजवानी यांचा राखणदार (1982), कांचन नायक यांचा कळत नकळत (1989), या चित्रपटांचा यात समावेश आहे.

भालजी पेंढारकर यांचा साधी माणसं (1965), राजा ठाकूर यांचा राजमान्य राजश्री (1959), एकटी (1968) आणि घरकुल (1970), आणि रमेश देव यांचा छंद प्रीतीचा (1968) आणि जीवा सखा (1991) या गाजलेल्या मराठी चित्रपट निर्मात्यांच्या चित्रपटांचाही यात समावेश आहे.

हिंदीतला ‘नॉटी बॉय’ही दाखल

यासमवेत काही महत्त्वाचे हिंदी चित्रपटही यामध्ये आहेत. शक्ती सामंत यांचा नॉटी बॉय (1962), नायकाच्या भूमिकेत किशोर कुमार असलेला मिहान कुमार यांचा अमन (1967), रवींद्र दवे यांचा गेस्ट हाउस (1959), एम सादिक यांचा ताजमहल (1963), महमद हुसेन यांचा शिकारी (1963), केवळ मिश्र यांचा दो यार (1972) आणि उत्तम कुमार अभिनित अलो सरकार दिग्दर्शित (1978)मधला बंदी चित्रपटांचाही यात समावेश आहे.

Continue reading

‘वन नेशन, वन इलेक्शन’ला मोदी कॅबिनेटची मान्यता!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत (कॅबिनेट) 'वन नेशन, वन इलेक्शन' संकल्पनेच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली. केंद्रीय कॅबिनेटने याला मंजुरी दिल्यामुळे संसदेच्या शीतकालीन अधिवेशनात संबंधित विधेयक मांडण्यात येईल आणि शक्य झाले तर ते...

भारतातील विद्यार्थ्यांसाठी लीड ग्रुपचे टेकबुक तयार

भारतातील सर्वात मोठी स्कूल एडटेक कंपनी लीड ग्रुपने टेकबुक सादर करण्याची नुकतीच घोषणा केली. हे पारंपरिक पाठ्यपुस्तक-आधारित शिक्षणाला बदलण्यासाठी डिझाइन केलेले एक इंटेलिजंट बुक आहे. टेकबुक आजच्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये मुख्य शिक्षण आव्हानांवर उत्तर देण्यासाठी तीन अत्याधुनिक तंत्रज्ञानअनुकूल अभ्यासक्रम सादर करते. लीड ग्रुपचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमीत मेहता म्हणाले की, शतकानुशतके, वर्गखोल्यांमधील प्राथमिक शिक्षण साधन म्हणून पाठ्यपुस्तकात कोणताही बदल झालेला नाही. तर  त्याचवेळी एआय आणि एआर/व्हीआरने जगाला वेगवेगळ्या उद्योगक्षेत्रात वैयक्तिकृत, बहुपद्धती आणि गेमिफाईड अनुभवांकडे नेले आहे. आम्ही आपल्या देशाच्या भविष्यासाठी काहीतरी आणले आहे. टेकबुक हा तंत्रज्ञान, अध्यापनशास्त्र आणि अभ्यासक्रमातील अनेक वर्षांच्या संशोधनाचा एक क्रांतिकारी परिणाम आहे आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पद्धत यामुळे कायमस्वरूपी बदलेल. २०२८पर्यंत,  देशभरातली शाळेच्या वर्गांमध्ये वैयक्तिकृत आणि संवादात्मक शिक्षण हा मापदंड बनत भारतातील अग्रणी५००० शाळा टेकबुकसाठी अपग्रेड होतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. हे बुक पारंपरिक पाठ्यपुस्तकांच्या मर्यादांना दूर करून वैयक्तिकृत आणि संवादात्मक शिक्षण अनुभव सादर करते. विविध शिक्षण स्तर असलेल्या वर्गखोल्यांमध्ये, प्रत्येक विद्यार्थ्याला...

बीएलएस इंटरनॅशनलने सिटीझनशिप इन्व्हेस्ट घेतली ताब्यात

सरकार आणि नागरिकांसाठीची जागतिक स्तरावरील अग्रगण्य तंत्रज्ञानासिद्ध सेवा भागीदार संस्था बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेड (बीएलएस)ने १५हून अधिक देशांमध्ये निवास व नागरिकत्व मिळविण्यासाठीच्या जलदगती गुंतवणूक कार्यक्रमामध्ये विशेषीकृत सेवा पुरविणारी दुबईस्थित सल्लागार संस्था सिटीझनशिप इन्व्हेस्ट (सीआय)चे १०० टक्‍के भागभांडवल संपादित करण्यासाठी...
error: Content is protected !!
Skip to content