Homeपब्लिक फिगरपक्ष हेच आपले...

पक्ष हेच आपले कुटूंब!

‘उमेदवारी मिळाली नाही म्हणून कोणीही नाराज होऊ नका. पक्ष हे एक कुटूंब आहे, ही भावना जोपासा आणि कामाला लागा’, असे भावनिक आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांनी शनिवारी केले. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही पूर्णपणे कार्यकर्त्यांची आहे. पक्षाला मोठे करण्यात कार्यकर्त्यांचा वाटा सर्वात महत्त्वाचा आहे. कार्यकर्त्यांना संधी देणे ही सर्व नेत्यांची जबाबदारी आहे आणि सर्वांना टप्प्याटप्प्याने संधी मिळणारच आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यंदाच्या निवडणुकीत केवळ ‘इच्छा’ नव्हे, तर उमेदवाराची समाजातील प्रतिमा कशी आहे, याला महत्त्व दिले जाणार आहे. ज्यांना आता संधी दिली आहे, त्यांच्यासाठी आपण सर्वांनी अंग झटकून कामाला लागायचे आहे. राज्यात आपला पक्ष पहिल्या क्रमांकावर राहील, यासाठी एकजुटीने काम करा, असे आवाहन त्यांनी केले. सर्व कार्यकर्ते एकसमान असले तरी, स्थानिक परिस्थिती पाहून उमेदवारीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील, तो अंतिम राहील, असे सांगत त्यांनी पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे राज्यात राष्ट्रवादीला यश आणण्याचा संकल्प बोलून दाखवला.

नगराध्यक्षपदासाठी चार नावांचा प्रस्ताव

हिंगोली नगराध्यक्षपदासाठी चार इच्छुकांच्या नावांचा प्रस्ताव स्थानिक स्तरावर विचारविनिमय करून पक्षाचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अंतिम निर्णयासाठी पाठवला जाईल, अशी माहिती पालकमंत्री झिरवाळ यांनी दिली. नगरपालिकेच्या सर्व ३४ जागा स्वबळावर लढवण्याचा कार्यकर्त्यांचा विचार असून, कोणाला सोबत घ्यायचे याचा निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सल्ल्याने घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content