Homeब्लॅक अँड व्हाईटमुंबई-गोवा महामार्गावर उद्यापासून...

मुंबई-गोवा महामार्गावर उद्यापासून तीन दिवस अंशतः ब्लॉक

मुंबई-गोवा महामार्गावर कोलाडजवळील पुई येथे म्हैसदरा नवीन पुलाचे गर्डर बसवण्याच्या कामासाठी उद्या, ११ जुलैपासून १३ जुलैपर्यंत सकाळी ६ ते ८ या वेळेत आणि दुपारी २ ते ४ या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. तरी या कालावधीत मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने केले आहे.

या काळात प्रवाशांनी पुढील पर्यायी मार्गाचा अवलंब करावा-

१) वाकण फाटा येथून भिसे खिंड-रोहा-कालाडमार्गे पुन्हा मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

२) वाकण फाटा येथून पाली-रवाळजे-कोलाड किंवा पाली-रवाळजे-निजामपूर-माणगाववरून वळवून मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

३) खोपोली-पाली-वाकण राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पाली-रवाळजे-कोलाड किंवा पाली-रवाळजे-निजामपूर-माणगाववरून वळवून मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

या कालावधीत गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग-

१) कोलाड येथून कालाड-रोहा-भिसे खिंड-वाकण फाटा किंवा नागोठणेवरून वळवून मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

२) कोलाड येथून रवाळजे-पालीवरून वळवून वाकण-पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

३) कोलाड येथून रवाळजे-पाली-वाकण फाटावरून वळवून मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content