Homeब्लॅक अँड व्हाईटमुंबई-गोवा महामार्गावर उद्यापासून...

मुंबई-गोवा महामार्गावर उद्यापासून तीन दिवस अंशतः ब्लॉक

मुंबई-गोवा महामार्गावर कोलाडजवळील पुई येथे म्हैसदरा नवीन पुलाचे गर्डर बसवण्याच्या कामासाठी उद्या, ११ जुलैपासून १३ जुलैपर्यंत सकाळी ६ ते ८ या वेळेत आणि दुपारी २ ते ४ या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. तरी या कालावधीत मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने केले आहे.

या काळात प्रवाशांनी पुढील पर्यायी मार्गाचा अवलंब करावा-

१) वाकण फाटा येथून भिसे खिंड-रोहा-कालाडमार्गे पुन्हा मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

२) वाकण फाटा येथून पाली-रवाळजे-कोलाड किंवा पाली-रवाळजे-निजामपूर-माणगाववरून वळवून मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

३) खोपोली-पाली-वाकण राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पाली-रवाळजे-कोलाड किंवा पाली-रवाळजे-निजामपूर-माणगाववरून वळवून मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

या कालावधीत गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग-

१) कोलाड येथून कालाड-रोहा-भिसे खिंड-वाकण फाटा किंवा नागोठणेवरून वळवून मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

२) कोलाड येथून रवाळजे-पालीवरून वळवून वाकण-पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

३) कोलाड येथून रवाळजे-पाली-वाकण फाटावरून वळवून मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content