Homeबॅक पेजगेल्या 9 महिन्यांत...

गेल्या 9 महिन्यांत अंतराळ स्टार्टअप्समध्ये 1000 कोटींची गुंतवणूक!

चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते डिसेंबर 2023 या नऊ महिन्यांत भारतात अंतराळ स्टार्टअपमध्ये 1,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

नवी दिल्लीतील झी टीव्ही नॅशनल कॉन्क्लेव्हमध्ये एका विशेष मुलाखतीदरम्यान डॉ. सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयानंतर, भारताचे अंतराळ क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून उद्योग तसेच खाजगी क्षेत्रातील गुंतवणूकदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच ही गुंतवणूक शक्य झाली आहे.

चार वर्षांपूर्वी अंतराळ क्षेत्रात फक्त एका स्टार्टअपपासून ते हे क्षेत्र खुले झाल्यानंतर आपल्याकडे जवळपास 190 खाजगी अंतराळ स्टार्टअप्स आहेत आणि पूर्वीचे काही स्टार्टअप्स मालक आता उद्योजक बनले आहेत, असे ते म्हणाले.

2014 मध्ये फक्त 350 स्टार्टअप्स होते, मात्र आज आपल्या देशात युनिकॉर्न्स व्यतिरिक्त सुमारे 1,30,000 स्टार्टअप्स आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालबाह्य नियम रद्द केले आणि तंत्रज्ञानाच्या अनुकूल वापराद्वारे नागरिक केंद्रित प्रशासनावर लक्ष केंद्रित केले आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून श्रीहरिकोटाचे दरवाजे सर्व संबंधितांसाठी खुले करण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.

इतकेच नाही तर तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त वापर करण्याकडे सरकारचा कल आहे आणि ते सर्व अडथळे किंवा अडथळे आणणारे नियम, जे फारसे सक्षम नव्हते, ते दूर करण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले.

जग भविष्यात एकात्मिक तंत्रज्ञानावर आधारित वाढ अनुभवणार आहे. भारत आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञानासह तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडी घेत आहे, असे ते म्हणाले.

Continue reading

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या...
Skip to content