Homeबॅक पेजनोव्हेंबरमध्ये ईएसआयसीत 15...

नोव्हेंबरमध्ये ईएसआयसीत 15 लाख कामगारांची नवी नोंदणी!

ईएसआयसीच्या तात्पुरत्या वेतनपट आकडेवारीवरून असे दिसून येते की नोव्हेंबर 2023 महिन्यात 15.92 लाख नवीन कर्मचाऱ्यांची भर पडली आहे. नोव्हेंबर 2023मध्ये सुमारे 20,830 नवीन आस्थापनांची नोंदणी करण्यात आली आणि त्यांना कर्मचारी राज्य विमा योजनेच्या सामाजिक सुरक्षा कक्षेत आणण्यात आले. यामुळे अधिक कामगारांना संरक्षण मिळाले आहे.

देशाच्या तरुणाईसाठी अधिक नोकऱ्या उपलब्ध झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. कारण या महिन्यात भर पडलेल्या एकूण 15.92 लाख नवीन कर्मचाऱ्यांपैकी 25 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील तरुण कर्मचाऱ्यांची संख्या 7 लाख 47 हजार आहे. एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत हे प्रमाण 47% इतके आहे.

वेतनपटाच्या आकडेवारीचे लिंगनिहाय विश्लेषण केले असता असे दिसून येते की, नोव्हेंबर-2023मध्ये नोंदल्या गेलेल्या स्त्री-कर्मचाऱ्यांची संख्या 3.17 लाख आहे. तसेच नोव्हेंबर-2023 मध्ये एकूण 58 तृतीयपंथीय (ट्रान्सजेंडर) कर्मचाऱ्यांचीही नोंदणी झाल्याचे ही आकडेवारी सांगते. समाजाच्या प्रत्येक वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी ईएसआयसी वचनबद्ध असल्याचेच यावरून सिद्ध होते.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content