Homeबॅक पेजनोव्हेंबरमध्ये ईएसआयसीत 15...

नोव्हेंबरमध्ये ईएसआयसीत 15 लाख कामगारांची नवी नोंदणी!

ईएसआयसीच्या तात्पुरत्या वेतनपट आकडेवारीवरून असे दिसून येते की नोव्हेंबर 2023 महिन्यात 15.92 लाख नवीन कर्मचाऱ्यांची भर पडली आहे. नोव्हेंबर 2023मध्ये सुमारे 20,830 नवीन आस्थापनांची नोंदणी करण्यात आली आणि त्यांना कर्मचारी राज्य विमा योजनेच्या सामाजिक सुरक्षा कक्षेत आणण्यात आले. यामुळे अधिक कामगारांना संरक्षण मिळाले आहे.

देशाच्या तरुणाईसाठी अधिक नोकऱ्या उपलब्ध झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. कारण या महिन्यात भर पडलेल्या एकूण 15.92 लाख नवीन कर्मचाऱ्यांपैकी 25 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील तरुण कर्मचाऱ्यांची संख्या 7 लाख 47 हजार आहे. एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत हे प्रमाण 47% इतके आहे.

वेतनपटाच्या आकडेवारीचे लिंगनिहाय विश्लेषण केले असता असे दिसून येते की, नोव्हेंबर-2023मध्ये नोंदल्या गेलेल्या स्त्री-कर्मचाऱ्यांची संख्या 3.17 लाख आहे. तसेच नोव्हेंबर-2023 मध्ये एकूण 58 तृतीयपंथीय (ट्रान्सजेंडर) कर्मचाऱ्यांचीही नोंदणी झाल्याचे ही आकडेवारी सांगते. समाजाच्या प्रत्येक वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी ईएसआयसी वचनबद्ध असल्याचेच यावरून सिद्ध होते.

Continue reading

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली...

आज हनुमान जयंती! जाणून घ्या मारुतीच्या उपासनेमागील शास्त्र!! 

आज हनुमान (मारुती) जयंती! मनोजवम् मारुततुल्यवेगञ्, जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम्।। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये।। अर्थात् मनोवेगाने जाणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान, जितेंद्रिय, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ, वायुपुत्र, वानरसमुदायाचा अधिपती आणि श्रीरामाचा दूत, अशा मारुतीला मी शरण आलो आहे. मारुतीच्या अतुलनीय गुणवैशिष्ट्यांची ओळख या एका श्लोकावरून होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जवळचा वाटणारा...
Skip to content