Homeबॅक पेजनोव्हेंबरमध्ये ईएसआयसीत 15...

नोव्हेंबरमध्ये ईएसआयसीत 15 लाख कामगारांची नवी नोंदणी!

ईएसआयसीच्या तात्पुरत्या वेतनपट आकडेवारीवरून असे दिसून येते की नोव्हेंबर 2023 महिन्यात 15.92 लाख नवीन कर्मचाऱ्यांची भर पडली आहे. नोव्हेंबर 2023मध्ये सुमारे 20,830 नवीन आस्थापनांची नोंदणी करण्यात आली आणि त्यांना कर्मचारी राज्य विमा योजनेच्या सामाजिक सुरक्षा कक्षेत आणण्यात आले. यामुळे अधिक कामगारांना संरक्षण मिळाले आहे.

देशाच्या तरुणाईसाठी अधिक नोकऱ्या उपलब्ध झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. कारण या महिन्यात भर पडलेल्या एकूण 15.92 लाख नवीन कर्मचाऱ्यांपैकी 25 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील तरुण कर्मचाऱ्यांची संख्या 7 लाख 47 हजार आहे. एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत हे प्रमाण 47% इतके आहे.

वेतनपटाच्या आकडेवारीचे लिंगनिहाय विश्लेषण केले असता असे दिसून येते की, नोव्हेंबर-2023मध्ये नोंदल्या गेलेल्या स्त्री-कर्मचाऱ्यांची संख्या 3.17 लाख आहे. तसेच नोव्हेंबर-2023 मध्ये एकूण 58 तृतीयपंथीय (ट्रान्सजेंडर) कर्मचाऱ्यांचीही नोंदणी झाल्याचे ही आकडेवारी सांगते. समाजाच्या प्रत्येक वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी ईएसआयसी वचनबद्ध असल्याचेच यावरून सिद्ध होते.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content