Homeबॅक पेजनोव्हेंबरमध्ये ईएसआयसीत 15...

नोव्हेंबरमध्ये ईएसआयसीत 15 लाख कामगारांची नवी नोंदणी!

ईएसआयसीच्या तात्पुरत्या वेतनपट आकडेवारीवरून असे दिसून येते की नोव्हेंबर 2023 महिन्यात 15.92 लाख नवीन कर्मचाऱ्यांची भर पडली आहे. नोव्हेंबर 2023मध्ये सुमारे 20,830 नवीन आस्थापनांची नोंदणी करण्यात आली आणि त्यांना कर्मचारी राज्य विमा योजनेच्या सामाजिक सुरक्षा कक्षेत आणण्यात आले. यामुळे अधिक कामगारांना संरक्षण मिळाले आहे.

देशाच्या तरुणाईसाठी अधिक नोकऱ्या उपलब्ध झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. कारण या महिन्यात भर पडलेल्या एकूण 15.92 लाख नवीन कर्मचाऱ्यांपैकी 25 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील तरुण कर्मचाऱ्यांची संख्या 7 लाख 47 हजार आहे. एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत हे प्रमाण 47% इतके आहे.

वेतनपटाच्या आकडेवारीचे लिंगनिहाय विश्लेषण केले असता असे दिसून येते की, नोव्हेंबर-2023मध्ये नोंदल्या गेलेल्या स्त्री-कर्मचाऱ्यांची संख्या 3.17 लाख आहे. तसेच नोव्हेंबर-2023 मध्ये एकूण 58 तृतीयपंथीय (ट्रान्सजेंडर) कर्मचाऱ्यांचीही नोंदणी झाल्याचे ही आकडेवारी सांगते. समाजाच्या प्रत्येक वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी ईएसआयसी वचनबद्ध असल्याचेच यावरून सिद्ध होते.

Continue reading

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...
Skip to content