Wednesday, March 26, 2025
Homeएनसर्कलकांदा होणार आणखी...

कांदा होणार आणखी स्वस्त! निर्यातशुल्क हटवले!!

महाराष्ट्रात लासलगाव आणि पिंपळगाव येथील बाजारपेठेत या महिन्यापासून कांद्याची आवक वाढली आहे, ज्यामुळे किंमती घसरल्या आहेत. कांदा स्वस्त झाला आहे. 21 मार्च 2025 रोजी लासलगाव आणि पिंपळगाव येथे कांद्याचा भाव अनुक्रमे 1330 आणि 1325 रुपये प्रति क्विंटल होता. कृषी आणि कृषक कल्याण विभागाच्या अंदाजानुसार, यावर्षी कांद्याचे रब्बी उत्पादन 227 लाख मेट्रिक टन (एलएमटी) झाले आहे, जे गेल्या वर्षीच्या 192 लाख मॅट्रिक टनापेक्षा 18% अधिक आहे. भारतातील एकूण कांद्याच्या उत्पादनाच्या 70-75% वाटा असलेला रब्बी कांदा ऑक्टोबर/नोव्हेंबरपासून खरीप पिकाच्या आगमनापर्यंत एकूण उपलब्धता आणि किंमतींमध्ये स्थिरता राखण्यासाठी महत्त्वाचा आहे. या हंगामात अंदाजापेक्षा जास्त उत्पादन झाल्यामुळे येत्या काही महिन्यांत बाजारभाव आणखी कमी होतील अशी अपेक्षा आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरचे 20% निर्यात शुल्क येत्या 1 एप्रिलपासून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहक व्यवहार विभागासोबतच्या सल्लामसलतीनंतर महसूल विभागाने काल यासंबंधीची अधिसूचना जारी केली. 13 सप्टेंबर 2024पासून हे निर्यातशुल्क लागू करण्यात आले होते. देशांतर्गत कांद्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने आणि निर्यात नियंत्रित

करण्यासाठी सरकारने या निर्यातशुल्काची आकारणी, किमान निर्यात किंमत (MEP) आणि 8 डिसेंबर 2023 ते 3 मे 2024 या सुमारे पाच महिन्यांच्या कालावधीत निर्यातबंदी सारख्या उपाययोजना केल्या. निर्यातनिर्बंध असूनही, आर्थिक वर्ष 2023-24मध्ये कांद्याची 17.17 लाख मेट्रिक टन आणि आर्थिक वर्ष 2024-25 (18 मार्चपर्यंत)मध्ये 11.65 लाख मेट्रिक टन इतकी निर्यात झाली. सप्टेंबर 2024मध्ये कांद्याच्या मासिक निर्यातीचे प्रमाण 0.72 लाख मेट्रिक टन होते, जे जानेवारी 2025मध्ये 1.85 लाख मेट्रिक टनापर्यंत वाढले आहे.

रब्बी पिकांची अपेक्षित आवक वाढल्याने बाजारपेठेतील घाऊक आणि किरकोळ किंमती कमी झाल्या आहेत. या टप्प्यावर, ग्राहकांना परवडेल अशी कांद्याची किमत राखून शेतकऱ्यांना किफायतशीर भाव मिळवून देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. सध्या कांद्याच्या बाजारपेठेतील किंमती मागील वर्षांच्या याच कालावधीच्या तुलनेत जास्त असल्या तरी, देशस्तरावर सरासरी किमतींमध्ये 39%ची घट दिसून आली आहे. गेल्या एका महिन्यात देशस्तरावर कांद्याच्या सरासरी किरकोळ किमतींमध्ये 10%ची घट झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा कुणाल कामराचा हव्यास!

पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश किंवा अन्य न्यायमूर्ती तसेच न्यायव्यवस्था याच्याबद्दल अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं ही कुणाल कामराची कार्यपद्धती आहे. मुळात या व्यक्तीला वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांना लक्ष्य करत खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा...

सचिनभाऊ चषक शालेय कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे विजेता

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने झालेल्या आमदार सचिनभाऊ अहिर चषक विनाशुल्क राज्यस्तरीय शालेय मुलामुलींच्या कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी-मालाड स्कूलचा उदयोन्मुख सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळे विजेता ठरला. निर्णायक बोर्डपर्यंत पिछाडीवर राहिलेल्या प्रसन्नने अचूक फटकेबाज खेळ करणाऱ्या...

संवेदनशील मुख्यमंत्री आणि त्यांच्या यंत्रणेमुळे वाचला चहावाल्याचा जीव!

विजयसिंग बिरबलसिंग परमार. महाराष्ट्राच्या अकोल्यातील ६२ वर्षीय चहा विक्रेता.. आपल्या कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ. जीवघेण्या आजाराच्या विळख्यात अडकला. अचानक प्रकृती खालावल्याने त्यांचे जीवन संकटात आले आणि संपूर्ण कुटुंब आर्थिक गर्तेत सापडले. हाताशी ना बचत, ना मालमत्ता, ना कुठला आधार, उपचारासाठी...
Skip to content