Homeएनसर्कलकांदा होणार आणखी...

कांदा होणार आणखी स्वस्त! निर्यातशुल्क हटवले!!

महाराष्ट्रात लासलगाव आणि पिंपळगाव येथील बाजारपेठेत या महिन्यापासून कांद्याची आवक वाढली आहे, ज्यामुळे किंमती घसरल्या आहेत. कांदा स्वस्त झाला आहे. 21 मार्च 2025 रोजी लासलगाव आणि पिंपळगाव येथे कांद्याचा भाव अनुक्रमे 1330 आणि 1325 रुपये प्रति क्विंटल होता. कृषी आणि कृषक कल्याण विभागाच्या अंदाजानुसार, यावर्षी कांद्याचे रब्बी उत्पादन 227 लाख मेट्रिक टन (एलएमटी) झाले आहे, जे गेल्या वर्षीच्या 192 लाख मॅट्रिक टनापेक्षा 18% अधिक आहे. भारतातील एकूण कांद्याच्या उत्पादनाच्या 70-75% वाटा असलेला रब्बी कांदा ऑक्टोबर/नोव्हेंबरपासून खरीप पिकाच्या आगमनापर्यंत एकूण उपलब्धता आणि किंमतींमध्ये स्थिरता राखण्यासाठी महत्त्वाचा आहे. या हंगामात अंदाजापेक्षा जास्त उत्पादन झाल्यामुळे येत्या काही महिन्यांत बाजारभाव आणखी कमी होतील अशी अपेक्षा आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरचे 20% निर्यात शुल्क येत्या 1 एप्रिलपासून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहक व्यवहार विभागासोबतच्या सल्लामसलतीनंतर महसूल विभागाने काल यासंबंधीची अधिसूचना जारी केली. 13 सप्टेंबर 2024पासून हे निर्यातशुल्क लागू करण्यात आले होते. देशांतर्गत कांद्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने आणि निर्यात नियंत्रित

करण्यासाठी सरकारने या निर्यातशुल्काची आकारणी, किमान निर्यात किंमत (MEP) आणि 8 डिसेंबर 2023 ते 3 मे 2024 या सुमारे पाच महिन्यांच्या कालावधीत निर्यातबंदी सारख्या उपाययोजना केल्या. निर्यातनिर्बंध असूनही, आर्थिक वर्ष 2023-24मध्ये कांद्याची 17.17 लाख मेट्रिक टन आणि आर्थिक वर्ष 2024-25 (18 मार्चपर्यंत)मध्ये 11.65 लाख मेट्रिक टन इतकी निर्यात झाली. सप्टेंबर 2024मध्ये कांद्याच्या मासिक निर्यातीचे प्रमाण 0.72 लाख मेट्रिक टन होते, जे जानेवारी 2025मध्ये 1.85 लाख मेट्रिक टनापर्यंत वाढले आहे.

रब्बी पिकांची अपेक्षित आवक वाढल्याने बाजारपेठेतील घाऊक आणि किरकोळ किंमती कमी झाल्या आहेत. या टप्प्यावर, ग्राहकांना परवडेल अशी कांद्याची किमत राखून शेतकऱ्यांना किफायतशीर भाव मिळवून देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. सध्या कांद्याच्या बाजारपेठेतील किंमती मागील वर्षांच्या याच कालावधीच्या तुलनेत जास्त असल्या तरी, देशस्तरावर सरासरी किमतींमध्ये 39%ची घट दिसून आली आहे. गेल्या एका महिन्यात देशस्तरावर कांद्याच्या सरासरी किरकोळ किमतींमध्ये 10%ची घट झाली आहे.

Continue reading

हा पाहा महायुती सरकारचा दुटप्पीपणा!

देशातीलच नव्हे तर जगातील शास्त्रज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञ यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे कबुतरापासून माणसाच्या फुफ्फुसाला धोका निर्माण होतो, हे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने योग्य निर्णय देत यावर बंदीही आणली असतानाही, दादरला एक समुदाय कबुतरांना खायला दाणे टाकून न्यायालयाच्या निर्णयाला...

कोमसाप मुंबईच्या अध्यक्षपदी विद्या प्रभू; जगदीश भोवड जिल्हा प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षपदी विद्या प्रभू यांची निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्ष मनोज वराडे आणि विद्या प्रभू यांच्यात लढत झाली. त्यात विद्या प्रभू विजयी झाल्या. यावेळी मुंबई जिल्ह्याची कार्यकारिणीही निवडण्यात आली. केंदीय समितीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून जगदीश...

महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेसाठी नोंदवा 31 ऑगस्टपर्यंत सहभाग

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 3 नोव्हेंबर, 2025पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांंसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांंसाठी नाट्यसंस्थांकडून येत्या 31 ऑगस्ट, 2025पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती...
Skip to content