Homeन्यूज अँड व्ह्यूजअणुउर्जा हा सर्वात...

अणुउर्जा हा सर्वात उर्जानिर्मितीसाठी स्वच्छ पर्याय!

स्वच्छ उर्जा स्थित्यंतरासाठी सरकार लहान अणुभट्टीसारख्या नव्या तंत्रज्ञानांवर काम करत आहे अशी माहिती केंद्रीय अणुउर्जा आणि अवकाश या विभागांचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी नुकतीच लोकसभेत दिलेल्या लिखित उत्तरात दिली. अणुउर्जा हा उर्जानिर्मितीसाठी सर्वात आश्वासक स्वच्छ उर्जापर्याय आहे, असे ते म्हणाले.

येत्या काही वर्षात जीवाश्म इंधनावरीर अवलंबीत्व कमी करू शकणाऱ्या अणुऊर्जेचा वापर करण्याच्या धोरणावर जगभरात भर दिला जात आहे.

कमी क्षमतेचे अणुउर्जा प्रकल्प ज्यांना सार्वत्रिकपणे लहान मॉड्युलर अणुभट्ट्या (एसएमआर्स) म्हणतात. त्यांच्या लघु आकार आणि मोठ्या प्रमाणातील कार्यक्षमता तसेच कमी कार्बन पदचिन्हे तसेच सुधारित सुरक्षितता या वैशिष्ट्यपूर्ण घटकांमुळे या अणुभट्ट्या कार्यनिवृत्त होत असलेल्या कोळशावर आधारित औष्णिक उर्जा उत्पादन केंद्राच्या जागांचा पुनरुपयोग करण्यासाठीचा आकर्षक पर्याय ठरतात. देशभरात सर्वत्र, विशेषतः मोठ्या अणुभट्ट्या उभारण्यासाठी सोयीस्कर नसलेल्या ठिकाणी लहान मॉड्युलर अणुभट्ट्या (एसएमआर्स) उभारल्यास, त्यांतून कमी कार्बन उत्सर्जनासह मोठ्या प्रमाणात विद्युतनिर्मिती करता येऊ शकेल. जीवाश्म इंधन वापर टाळण्याच्या दृष्टीने, जुन्या झालेल्या जीवाश्मइंधन आधारित विद्युतनिर्मिती प्रकल्पांचा पुनरुपयोग करण्यासाठी देखील एसएमआर्सची उभारणी तसेच कार्यान्वयन करता येऊ शकेल.

अर्थात, एसएमआर्स हे मोठ्या आकाराच्या अणुउर्जा आधारित पारंपरिक विद्युतनिर्मिती प्रकल्पांना पर्याय ठरू शकत नाहीत कारण हे मोठे प्रकल्प पायाभूत पातळीवर मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती करतात.

प्रत्येक परिस्थितीत किरणोसर्ग नियंत्रित करण्यासाठी आणि जनतेला त्या किरणांचा संपर्क होणे टाळण्यासाठी घालून दिलेल्या कठोर नियामकीय अटींनुसारच अणुउर्जा प्रकल्प उभारले आणि परिचालित केले जातात. एसएमआर्सचा तांत्रिक-व्यावसायिक दृष्टीकोन जगातील पातळीवर देखील अजून प्राथमिक अवस्थेत आहे आणि त्यांची मोठ्या प्रमाणातील अंमलबजावणी, आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेतर्फे (आयएईए) जागतिक पातळीवरील नियामकीय सुसंवादीकरणासह, विशेषतः आपत्कालीन नियोजन विभाग आणि सार्वजनिक स्वीकृतीसह  विविध घटकांवर अवलंबून आहे.

Continue reading

तासाभरातच तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री! ९ आमदारही घेणार शपथ!!

तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १०...

11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक घोषित

महाराष्ट्रातल्या इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27साठी नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने हे जाहीर केले आहे. आज, 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जाचा भाग-1 आणि...

मतदारांना भुरळ घालण्यासाठी बाळगली 1,400 कोटींची अवैध सामग्री

भारतात 2024 साली लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून, नुकत्याच झालेल्या आसाम, केरळम्, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच 5 राज्यांमधल्या 7 विधानसभेच्या पोटनिवडणुकांदरम्यान मतदारांना भुरळ घालण्यासाठी तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेकायदेशीर सामग्री बाळगली होती....
Skip to content