Homeडेली पल्सआता जनताच तुतारीची...

आता जनताच तुतारीची पिपाणी करणार!

विकासकामांमुळे विरोधकांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु ‘देव तारी त्याला कोण मारी..’ आणि येथे ‘जनता म्हणजेच देव’ आहे. याच जनतेने आता ही निवडणूक हातात घेतली आहे. अस्मिता, विकास आणि जनतेच्या विरोधात निर्णय घेणार्‍यांना जनता कधीच माफ करत नाही. आता जनता तुतारीची पिपाणी करणार यात शंका नाही, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

माढा लोकसभा भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ फलटण, सातारा येथे आयोजित भाजपा महाविजय संकल्प सभेत उपस्थित विशाल जनसागराला फडणवीस यांनी काल संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणकरांचे चोरीला गेलेले पाणी परत आणले. या भागात फलटण-बारामती रेल्वे आणली आणि 23 वर्ष बंद असलेल्या फलटण-पंढरपूर रेल्वेच्या कामासाठी ₹ 921 कोटींची मंजुरी मिळवली. यासोबतच पुणे-बंगळुरू ग्रीन कॉरिडॉर हा सुमारे ₹ 50,000 कोटींचा प्रकल्प त्यांच्याच पाठपुराव्यामुळे सुरू होतो आहे. या कॉरिडॉरभोवती सुरू होणार्‍या एमआयडीसीमुळे तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे, असे ते म्हणाले.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी फलटण हिमालयासारखा उभा असल्याचीच ग्वाही या सभेला उपस्थित जनसागरानेच दिली. यावेळी परभणी लोकसभा महायुती (रासपा) उमेदवार महादेव जानकर, आ. प्रसाद लाड, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content