Homeचिट चॅटविश्व केटलबेल स्पर्धेत...

विश्व केटलबेल स्पर्धेत निरव कोळीला रौप्यपदक

नुकत्याच स्पेनमधील पाल्मा डे मॉलओरका शहरात झालेल्या विश्व केटलबेल स्पर्धेत मुंबईचा युवा खेळाडू निरव कोळीने पदार्पणातच रौप्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला. २२ देशांचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यात भारताच्या आठ खेळाडूंचा सहभाग होता. भारतीय संघात निरव हा एकमेव महाराष्ट्राचा खेळाडू होता. त्यानेच भारताला या स्पर्धेतील एकमेव पदक ७५ ते ८५ या खुल्या वजनी गटात मिळवून दिले.

गेम जर्क या प्रकारात उतरलेल्या निरजने १४२ गुणांची कमाई केली. गेली ५ वर्षे निरव या खेळाचे प्रशिक्षण घेत आहे. माझगाव, ताडवाडी येथे राहणाऱ्या निरवचे अर्णव सरकार प्रशिक्षक आहेत. जागतिक स्पर्धेपूर्वी नवी दिल्लीत केटलबेलची राष्ट्रीय स्पर्धा संपन्न झाली. त्यामध्ये निरवने सीएमएस रँक मिळवून आपले विश्व स्पर्धेचे तिकीट पक्के केले. सध्या निरव फिटनेस प्रोफेशनल म्हणून कार्यरत आहे.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content