Homeचिट चॅटविश्व केटलबेल स्पर्धेत...

विश्व केटलबेल स्पर्धेत निरव कोळीला रौप्यपदक

नुकत्याच स्पेनमधील पाल्मा डे मॉलओरका शहरात झालेल्या विश्व केटलबेल स्पर्धेत मुंबईचा युवा खेळाडू निरव कोळीने पदार्पणातच रौप्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला. २२ देशांचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यात भारताच्या आठ खेळाडूंचा सहभाग होता. भारतीय संघात निरव हा एकमेव महाराष्ट्राचा खेळाडू होता. त्यानेच भारताला या स्पर्धेतील एकमेव पदक ७५ ते ८५ या खुल्या वजनी गटात मिळवून दिले.

गेम जर्क या प्रकारात उतरलेल्या निरजने १४२ गुणांची कमाई केली. गेली ५ वर्षे निरव या खेळाचे प्रशिक्षण घेत आहे. माझगाव, ताडवाडी येथे राहणाऱ्या निरवचे अर्णव सरकार प्रशिक्षक आहेत. जागतिक स्पर्धेपूर्वी नवी दिल्लीत केटलबेलची राष्ट्रीय स्पर्धा संपन्न झाली. त्यामध्ये निरवने सीएमएस रँक मिळवून आपले विश्व स्पर्धेचे तिकीट पक्के केले. सध्या निरव फिटनेस प्रोफेशनल म्हणून कार्यरत आहे.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content