Homeटॉप स्टोरीफडणवीसांच्या शिष्टाईनंतर निलेश...

फडणवीसांच्या शिष्टाईनंतर निलेश राणे पुन्हा सक्रिय राजकारणात!

अखेर भारतीय जनता पार्टीचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी झाली. भाजपा नेते निलेश राणे यांनी आपला सक्रिय राजकारणातल्या निवृत्तीचा निर्णय अखेर मागे घेतला आहे.

काल दसऱ्याच्या मुहूर्तावर भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी आपण सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले होते. एका ट्विटच्या माध्यमातून त्यांनी आपली ही भूमिका मांडताना कोणावरही दोषारोप न करता राजकारणात मन रमत नसल्याचे कारण पुढे करत निवृत्तीची घोषणा केली. या घोषणामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. भाजपा नेते आणि सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आणि निलेश राणे यांचे वरचेवर खटके उडत असल्यामुळे तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या राजकारणात निलेश राणेंना डावलले जात असल्यामुळे राणे यांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा काल रंगली होती.

राणे

त्यानंतर आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास स्वतः रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांची त्यांच्या निवासस्थानी (अधीश बंगल्यावर) जाऊन भेट घेतली. यावेळी जवळजवळ तीन तास उभयतांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर हे दोघेही नेते एकाच गाडीतून उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सारंग, या शासकीय निवासस्थानी पोहोचले. तेथे या तिन्ही नेत्यांमध्ये जवळजवळ सव्वा तास चर्चा झाली. आपापसातले हेवेदावे आणि मतभेद तूर्तास बाजूला ठेवा. लोकसभा, त्यापाठोपाठ विधानसभा अशा विविध निवडणुका सध्या दृष्टीक्षेपात आहेत. या निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अशावेळी आपापसातले मतभेद योग्य नव्हेत, असे सांगत फडणवीस यांनी निलेश राणे यांचे मन वळवण्यात यश मिळवल्याचे सूत्रांनी  सांगितले.

बैठकीनंतर माध्यमांशी कोणीही नेते काहीही बोलले नाहीत. मात्र त्यानंतर निलेश राणे, रवींद्र चव्हाण आणि फडणवीस यांचे एकत्रित छायाचित्र माध्यमांकडे पोहोचते झाले. त्याचबरोबर भाजपाचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी निलेश राणे यांनी आपला राजकीय निवृत्तीचा निर्णय मागे घेतला असल्याचे घोषित केले. त्यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्त्वाखाली सिंधुदूर्गमध्ये भाजपा अधिक मजबूत होईल, अशी आशाही जठार यांनी व्यक्त केली असल्याचे समजते.

Continue reading

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...
Skip to content