Homeचिट चॅटनौदलाचे कोविडसाठी ऑपरेशन...

नौदलाचे कोविडसाठी ऑपरेशन ‘समुद्र सेतू-2’ सुरू!

कोविड-19 महामारीविरोधात सुरू असलेल्या लढ्यात राष्ट्रीय स्तरावरच्या प्रयत्नांना हातभार लावण्याच्या हेतूने, भारतीय नौदलाने ऑपरेशन ‘समुद्र सेतू-2’ सुरू केले आहे. या अंतर्गत, नौदलाच्या तिन्ही विभागातून म्हणजेच मुंबई, विशाखापट्टणम आणि कोची येथून भारताच्या युद्धनौका रवाना झाल्या आहेत. या नौकांमधून विविध मित्र राष्ट्रांकडून समुद्रमार्गे सध्या भारतात अत्यंत आवश्यक असलेले ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय साधने आणली जात जात आहेत.

पश्चिम समुद्रमार्गे काल दुपारी भारताची युद्धनौका आयएनएस तलवार बाहरीन इथून 27 टन द्रवरूप ऑक्सिजनचे दोन टॅंक घेऊन, भारतात कर्नाटकच्या न्यू मंगलोर पोर्टच्या धक्क्यावर पोहोचली. त्याशिवाय, आयएनएस कोलकाता कुवैतहून 27 टन द्रवरूप ऑक्सिजनचे दोन टॅंक घेऊन, 400 ऑक्सिजनयुक्त सिलेंडर्स, 47 काँसंट्रेटर्स आणि इतर वैद्यकीय साधने घेऊन भारताकडे रवाना झाल्या आहेत. यासोबतच, आणखी चार युद्धनौका कुवैत तसेच कतार येथून 27 टन द्रवरूप ऑक्सिजनचे टॅंक आणि 1500पेक्षा अधिक ऑक्सिजन सिलेंडर्स घेऊन येणार आहेत.

समुद्र सेतू

पूर्व समुद्रमार्गाने भारताची युद्धनौका आयएनएस ऐरावत सिंगापूरहून 3000पेक्षा अधिक ऑक्सिजन सिलेंडर्स, 27 टन द्रवरूप ऑक्सिजनचे आठ टॅंक (216 टन), 10000 रॅपिड अँटीजेन टेस्ट कीट्स आणि 7 काँसंट्रेटर्स घेऊन भारताकडे रवाना झाली आहे. तसेच आयएनएस जलाश्व ही युद्धनौका सध्या नैऋत्य आशियात तैनात असून, परिस्थितीनुसार गरज भासल्यास, तिलाही त्या प्रदेशातील बंदरावर पाठवले जाऊ शकते.

आयएनएस शार्दूल, ही कोचीच्या तळावरील युद्धनौकादेखील आखाती देशांतून तीन द्रवरूप ऑक्सिजन भरलेले क्रायोजनिक कंटेनर्स घेऊन येत आहे. आयएनएस जलाश्व आणि आयएनएस शार्दूल यांनी गेल्यावर्षीच्या समुद्र सेतू अभियानातदेखील सहभाग घेतला होता.

गेल्या वर्षी नौदलाने जसे समुद्र सेतू अभियान राबवून हिंद महासागर प्रदेशातल्या-IOR देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणले होते, तशाच प्रकारे, भारतीय नौदल आजही देशाच्या या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

1 COMMENT

  1. महिती अत्यंत उपयुक्त आहे…… असेच लिखाण व्हावे….

Comments are closed.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content