Homeचिट चॅटनौदलाचे कोविडसाठी ऑपरेशन...

नौदलाचे कोविडसाठी ऑपरेशन ‘समुद्र सेतू-2’ सुरू!

कोविड-19 महामारीविरोधात सुरू असलेल्या लढ्यात राष्ट्रीय स्तरावरच्या प्रयत्नांना हातभार लावण्याच्या हेतूने, भारतीय नौदलाने ऑपरेशन ‘समुद्र सेतू-2’ सुरू केले आहे. या अंतर्गत, नौदलाच्या तिन्ही विभागातून म्हणजेच मुंबई, विशाखापट्टणम आणि कोची येथून भारताच्या युद्धनौका रवाना झाल्या आहेत. या नौकांमधून विविध मित्र राष्ट्रांकडून समुद्रमार्गे सध्या भारतात अत्यंत आवश्यक असलेले ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय साधने आणली जात जात आहेत.

पश्चिम समुद्रमार्गे काल दुपारी भारताची युद्धनौका आयएनएस तलवार बाहरीन इथून 27 टन द्रवरूप ऑक्सिजनचे दोन टॅंक घेऊन, भारतात कर्नाटकच्या न्यू मंगलोर पोर्टच्या धक्क्यावर पोहोचली. त्याशिवाय, आयएनएस कोलकाता कुवैतहून 27 टन द्रवरूप ऑक्सिजनचे दोन टॅंक घेऊन, 400 ऑक्सिजनयुक्त सिलेंडर्स, 47 काँसंट्रेटर्स आणि इतर वैद्यकीय साधने घेऊन भारताकडे रवाना झाल्या आहेत. यासोबतच, आणखी चार युद्धनौका कुवैत तसेच कतार येथून 27 टन द्रवरूप ऑक्सिजनचे टॅंक आणि 1500पेक्षा अधिक ऑक्सिजन सिलेंडर्स घेऊन येणार आहेत.

समुद्र सेतू

पूर्व समुद्रमार्गाने भारताची युद्धनौका आयएनएस ऐरावत सिंगापूरहून 3000पेक्षा अधिक ऑक्सिजन सिलेंडर्स, 27 टन द्रवरूप ऑक्सिजनचे आठ टॅंक (216 टन), 10000 रॅपिड अँटीजेन टेस्ट कीट्स आणि 7 काँसंट्रेटर्स घेऊन भारताकडे रवाना झाली आहे. तसेच आयएनएस जलाश्व ही युद्धनौका सध्या नैऋत्य आशियात तैनात असून, परिस्थितीनुसार गरज भासल्यास, तिलाही त्या प्रदेशातील बंदरावर पाठवले जाऊ शकते.

आयएनएस शार्दूल, ही कोचीच्या तळावरील युद्धनौकादेखील आखाती देशांतून तीन द्रवरूप ऑक्सिजन भरलेले क्रायोजनिक कंटेनर्स घेऊन येत आहे. आयएनएस जलाश्व आणि आयएनएस शार्दूल यांनी गेल्यावर्षीच्या समुद्र सेतू अभियानातदेखील सहभाग घेतला होता.

गेल्या वर्षी नौदलाने जसे समुद्र सेतू अभियान राबवून हिंद महासागर प्रदेशातल्या-IOR देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणले होते, तशाच प्रकारे, भारतीय नौदल आजही देशाच्या या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

1 COMMENT

  1. महिती अत्यंत उपयुक्त आहे…… असेच लिखाण व्हावे….

Comments are closed.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content