Homeटॉप स्टोरीदेशभरातली निवडणूक आचारसंहिता...

देशभरातली निवडणूक आचारसंहिता समाप्त!

देशातल्या लोकसभा निवडणुकीसाठी जारी करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता आजपासून उठविण्यात आली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये विधान परिषदेच्या शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपर्यंत तेथील आचारसंहिता मात्र कायम राहील, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

याबाबतची अधिसूचना आज जारी करण्यात आली. लोकसभेच्या निवडणुका घोषित करताना साधारण दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता जारी केली होती. सात टप्प्यात झालेल्या मतदानानंतर चार जूनला मतमोजणी होऊन संपूर्ण निकाल जाहीर झाल्यावर ही प्रक्रिया संपल्याचे सांगत निवडणूक आयोगाने आचारसंहिता उठवण्यात आल्याचे घोषित केले.

याबाबतची अधिसूचना अशीः

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content