Sunday, September 8, 2024
Homeटॉप स्टोरीनार्वेकरांनी मिंध्यांसह जनतेच्या...

नार्वेकरांनी मिंध्यांसह जनतेच्या न्यायालयात या आणि बघा!

माझे आव्हान आहे. नार्वेकरांनी, मिंध्यांनी माझ्यासोबत जनतेच्या न्यायालयामध्ये यावे आणि तिथे सांगावे शिवसेना कुणाची? मग जनतेने ठरवावे कोणाला पुरावा, गाडावा की तुडवावा… शिवसेना जर तुम्ही विकली असाल; तर मी जिथे जिथे जातो, तिथे तिथे शिवसैनिक माझ्यासोबत कसे?, असा सवाल शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज वरळीत आयोजित केलेल्या महापत्रकार परिषदेत केला.

भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले होते की, देशात एकच पक्ष राहणार आहे आणि तो म्हणजे भाजपा. फक्त भाजपाच पक्ष राहणार असल्याचे ते म्हणाले होते आणि त्याची ही सुरूवात आहे. एका पक्षाचा अध्यक्ष उघडपणे सर्व पक्ष संपून जाणार असल्याचे सांगत आहे. हे खूप घातक असून, लोकशाहीच्या खुनाची सुरुवात झाली आहे. सगळे पक्ष संपवून देशात एक पक्ष राहणार, हे एका राष्ट्रीय सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष बोलतो; तर लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या निवडणूक आयोगाला हे मान्य आहे का? ज्या महाराष्ट्रात रामशास्त्री जन्माला आले, घटना लिहणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले; त्या महाराष्ट्रापासून ह्यांनी लोकशाहीच्या खुनाला सुरुवात केली! लोकशाहीच्या हत्त्याऱ्यांना माहीत नाही; महाराष्ट्राची ही माती गद्दारांना थारा देत नाही, असेही ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाकडून आता शेवटची आशा आहे. लोकशाहीचा मूलभूत घटक असणाऱ्या जनतेच्या न्यायालयात आपण आलो आहोत. सरकार कोणाचेही असले तरी, सत्ता ही सामान्य जनतेचीच असली पाहिजे. अध्यक्षांनी आमच्याही आमदारांना अपात्र केले नाही आणि त्यांच्याही. ते आता कोर्टात गेले आहेत. म्हणजे त्यांचाही अध्यक्षांवर विश्वास नाही. मी राज्यपालांना विनंती करतो, एक अधिवेशन पुन्हा बोलवा आणि मिंध्यांना सांगतो; विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणा, मी तुम्हाला पाठिंबा देतो. हाकला त्यांना!, असेही ठाकरे यांनी सांगितले.

व्हीपचा अर्थ आहे चाबूक! चाबूक लाचारांच्या हातात शोभत नाही. शिवसेनाप्रमुखांच्या आणि शिवसैनिकांच्या हातात शोभतो! आपण निवडणूक आयोगावर एक केस करायला पाहिजे. आपल्याकडून त्यांनी शपथपत्रे आणि प्रतिज्ञापत्रे मागितली. १०० रूपयांच्या स्टँपपेपरवर १९ लाख ४१ हजार प्रतिज्ञापत्रे दिली होती. ती जर केराच्या टोपल्यात टाकायची होती तर मग मागितली कशाला? सर्वसामान्य शिवसैनिकांचे हे पैसे आयोगाने पपरत केले पाहिजेत.  सरकारने गाद्या पुरवल्या नाहीत, म्हणून निवडणूक आयोग त्यांना गाद्या समजून झोपलेय का?, असा सवाल त्यांनी केला.

मला सत्तेचा मोह नव्हता; एका क्षणात मी वर्षा सोडले आणि एका क्षणात मुख्यमंत्रीपदही सोडले. राज्यपालांनी जे अधिवेशन बोलवले होते, ते असंविधानिक होते. आपल्या देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही, सुप्रीम कोर्ट अस्तित्त्वात राहणार, की लबाड (लवाद) त्याच्या डोक्यावर बसणार; हे पाहण्याची ही लढाई आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश सर्वोच्च मानायचा, की लबाडाचा आदेश सर्वोच्च मानायचा; ही लढाई उद्या होणार आहे. आमच्या पात्र,  अपात्रतेचा निर्णय माझी जनता घेईल; ते म्हणतील त्या दिवशी मी घरी बसेन. पण लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही?, असा सवाल त्यांनी केला.

कोर्ट फाशीची शिक्षा सुनावते; पण प्रत्यक्ष अंमलात आणतो जल्लाद! त्या जल्लादाचे काम ह्या लवादाला दिले होते. सुप्रीम कोर्टाने तयारी करून दिली, पण लवाद म्हणतो; ह्यांना फाशी कशी देऊ? ह्यांच्या जन्माचा दाखलाच नाही. पण कोर्टाने जन्माचा दाखला तपासण्यास नाही तर, जो गुन्हा केलाय त्याबद्दल त्याला फाशी द्यायला सांगितले होते. जर 1999नंतर शिवेसनेची घटनाच अस्तित्त्वात नव्हती तर 2014 साली मला कशाला मोदींना पाठिंबा द्यायला पाठवले होते? 2019 साली कशाला सहीसाठी बोलावले होते? तिकडेच ढोकळ्यावाल्याची सही घ्यायची होती ना असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मिंधे-फिंद्यांना कुणी पदे दिली? माझे मत अवैध असेल तर अमित शाह कशाला मातोश्रीवर आलेले, सवाल त्यांनी केला.

Continue reading

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची बाजी!

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे...

उद्यापासून श्री गणेशोत्सव!

उद्यापासून गणेशोत्सव! गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,...
error: Content is protected !!
Skip to content