Homeमुंबई स्पेशलमुंबईकरांनो.. जाणून घ्या...

मुंबईकरांनो.. जाणून घ्या तुमच्या पोस्टमनविषयी!

मुंबई टपाल विभागाकडून आज “तुमच्या पोस्टमनविषयी जाणून घ्या” (Know your Postman) या मोबाईल अॅपचा आरंभ करण्यात आला. पोस्टमास्तर जनरल स्वाती पांडे यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती. त्यांच्याच संकल्पनेतून या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.

मुंबई टपाल विभागाने तयार केलेल्या या अनोख्या अॅपच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या क्षेत्रातील पोस्टमनविषयी तपशील उपलब्ध होणार आहे. क्षेत्राचे नाव, टपाल कार्यालयाचे नाव आणि पिनकोडच्या माध्यमातून मुंबई शहर आणि उपनगरांतील 86,000पेक्षा अधिक क्षेत्रांची माहिती या अॅपवर उपलब्ध आहे. मोबाईल अॅप https://cutt.ly/kypmr या लिंकच्या माध्यमातून गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करता येईल. जर एखादा पत्ता यावर उपलब्ध झाला नाही तर तो पत्ता तत्काळ टपाल खात्याला कळवून 24 तासाच्या आत अद्ययावत केला जाईल.

मुंबई शहरात 89 टपाल कार्यालये आहेत, ज्यात 2000 पोस्टमन (महिला आणि पुरुष) यांच्याकडे मोबाईल उपलब्ध आहे. मुंबई शहरात दररोज सुमारे 2 ते 2.5 लाख टपालसाहित्य,  ज्यात स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड पोस्ट, आधार कार्ड, पासपोर्टचे वितरण केले जाते.

टपाल खात्याच्या डिजीटलीकरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत मुंबई टपाल विभागाने “तुमच्या पोस्टमनविषयी जाणून घ्या” ही सुविधा सुरू केली आहे. यात पोस्टमन तपशील, संपर्क क्रमांक, संबंधित टपाल कार्यालयाचा तपशील आणि संपर्क क्रमांक व पत्ता उपलब्ध आहे. यामुळे नागरिकांना टपाल व्यवहार करणे सुलभ होणार आहे. नागरिकांना पोस्टमनशी संपर्क साधून आपल्या उपलब्धतेनुसार त्यांच्याकडून टपालसाहित्य घेता येईल. नागरिकांच्या दृष्टीने हाताळण्यासाठी अतिशय सुलभ असे हे अॅप निर्माण करण्यात आले आहे, असे पोस्ट मास्तर जनरल स्वाती पांडे यावेळी म्हणाल्या.

टपाल खात्याकडून गेल्या तीन महिन्यांपासून पोस्टमनना याचे नियमितपणे कौशल्य आणि संवाद प्रशिक्षण दिले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चापासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content