Homeचिट चॅटराष्ट्रीय सब ज्युनियर...

राष्ट्रीय सब ज्युनियर जंप रोप स्पर्धेत मुंबई उपनगरची बाजी

नांदेड येथे नुकत्याच झालेल्या २१व्या राष्ट्रीय सब ज्युनियर जंप रोप स्पर्धेत मुंबई उपनगरच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना ४ सुवर्ण, २ रौप्य, १३ कांस्य अशी एकूण १९ पदकांची कमाई केली.

या स्पर्धेत विविध राज्यांतून ३००पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्रदादा चव्हाण यांनी केले. क्रीडा संकुल, यशवंत महाविद्यालय येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरच्या १२ खेळाडूंचा सहभाग होता. या स्पर्धेत मुंबई उपनगरच्या युग पटेल, आरोही कांबळे, हर्ष कांबळे, आशनी नितीन काळे, मन पटेल, उत्कर्ष शाह, मन मारू, नम्र वासानी, नैती वासानी यांनी पदके जिंकली.

नम्र वासानीने १ सुवर्ण, ३ कांस्य पदके पटकावली. तर आरोही कांबळे, नैती वासानीने प्रत्येकी १ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य पदक जिंकले. मन पटेलने १ सुवर्ण, २ कांस्य पदकांची कमाई केली. युग पटेलला १ सुवर्ण, १ कांस्य पदक मिळाले. प्रशिक्षक विद्धेश मोरे यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले. पदकविजेत्या खेळाडूंचे खास अभिनंदन मुंबई सबअर्बन जंप रोप संघटनेचे अध्यक्ष, स्वप्नील पहुरकर, सचिव, वर्षा काळे, खजिनदार, योगेश सांगळे यांनी केले.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content