Sunday, September 8, 2024
Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात...

महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात सरासरी ६१.४४ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली असून ११ मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे:-

रायगड- ५८.१०, बारामती– ५६.०७, उस्मानाबाद- ६०.९१, लातूर- ६०.१८, सोलापूर– ५७.६१, माढा– ६२.१७, सांगली- ६०.९५, सातारा- ६३.०५, रत्नागिरी-सिंधुदूर्ग- ५९.२३, कोल्हापूर- ७०.३५ आणि हातकणंगले- ६८.०७ टक्के. ही अंदाजी टक्केवारी असून अंतीम टक्केवारी साधारण ३ ते ४ टक्क्यांनी वाढलेली असेल, असे सूत्रांनी सांगितले.

मतदान

सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.६४ टक्के मतदान

काल सकाळी ७ वाजल्यापासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी  ६.६४  टक्के मतदान झाले. लातूरमध्ये ७.९१, सांगलीत ५.८१, बारामतीत ५.७७, हातकणंगलेमध्ये ७.५५, कोल्हापूरमध्ये ८.०४, माढात ४.९९, उस्मानाबादेत ५.७९, रायगडमध्ये ६.८४, रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये ८.१७, साताऱ्यात ७.०० तर सोलापूरमध्ये ५.९२ टक्के मतदान झाले.

सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात ११ वाजेपर्यंत सरासरी  १८.१८ टक्के मतदान झाले. लातूरमध्ये २०.७४, सांगलीत १६.६१, बारामतीत १४.६४, हातकणंगलेमध्ये २०.७४, कोल्हापुरात २३.७७, माढामध्ये १५ .११, उस्मानाबादेत १७.०६, रायगडमध्ये १७.१८, रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये २१.१९, साताऱ्यात १८.९४ तर सोलापूरमध्ये १५.६९ टक्के मतदान झाले.

दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान झाले. लातूरमध्ये ३२.७१, सांगलीत २९.६५, बारामतीत २७.५५, हातकणंगलेत ३६.१७, कोल्हापूरमध्ये ३८.४२, माढामध्ये २६.६१, उस्मानाबादेत ३०.५४, रायगडमध्ये ३१.३४, रत्नागिरी–सिंधुदूर्गमध्ये ३३.९१, साताऱ्यात ३२.७८ तर सोलापूरमध्ये २९.३२ टक्के मतदान झाले.

मतदान

दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान झाले. लातूरमध्ये ४४.४८, सांगलीत ४१.३०, बारामतीत ३४.९६, हातकणंगलेत ४९.९४, कोल्हापुरात ५१.५१, माढामध्ये ३९.११, उस्मानाबादमध्ये ४०.९२, रायगडमध्ये ४१.४३, रत्नागिरी–सिंधुदूर्गमध्ये ४४.७३, साताऱ्यात ४३.८३ तर सोलापूरमध्ये ३९.५४ टक्के मतदान झाले.

सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान

तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले आहे. लातूरमध्ये ५५.३८, सांगलीत ५२.५६, बारामतीत ४५.६८, हातकणंगलेमध्ये ६२.१८, कोल्हापुरात ६३.७१, माढामध्ये ५०.००, उस्मानाबादेत ५२.७८, रायगडमध्ये ५०.३१, रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये ५३.७५, साताऱ्यात ५४.११ तर सोलापूरमध्ये ४९.१७ टक्के मतदान झाले.

Continue reading

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची बाजी!

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे...

उद्यापासून श्री गणेशोत्सव!

उद्यापासून गणेशोत्सव! गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,...
error: Content is protected !!
Skip to content