Homeचिट चॅटआमदार सचिनभाऊ चषक...

आमदार सचिनभाऊ चषक विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धा उद्या

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने आमदार सचिनभाऊ अहिर चषक १६ वर्षांखालील शालेय मुलामुलींची विनाशुल्क कॅरम स्पर्धा उद्या, १८ मार्चला परेल येथील आरएमएमएस सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जनरल सेक्रेटरी गोविंदराव मोहिते यांनी शालेय क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्याचे सातत्य यंदाही कायम राखले आहे. पहिल्या १६ विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार दिले जाणार आहेत.

चँम्पियन कॅरम बोर्डवर ही स्पर्धा बाद पद्धतीने होईल. प्रत्येक फेरीसाठी चार बोर्डची मर्यादा राहील. सदर स्पर्धेमधील निवडक खेळाडूंना उन्हाळी सुट्टीदरम्यान होणाऱ्या मार्गदर्शनासह शालेय मुलामुलींच्या सुपर लीग कॅरम स्पर्धेत मोफत संधी दिली जाणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संबंधित शालेय खेळाडूंनी प्रवेशअर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा चंद्रकांत करंगुटकर (९९८७८ ३१६२२) यांच्याकडे संपर्क साधावा. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघाचे पदाधिकारी निवृत्ती देसाई, अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर आदी मंडळी विशेष कार्यरत आहेत.    

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content