Homeकल्चर +'मिशन अयोध्या'चे छत्रपती...

‘मिशन अयोध्या’चे छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ शो हाऊसफुल्ल!

मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, विशेषतः मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये या चित्रपटाने विक्रमी कामगिरी केली आहे. शुक्रवार, शनिवारचे मिळून तब्बल १५ शो याठिकाणी हाऊसफुल्ल झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगरपाठोपाठ संपूर्ण मराठवाड्यात या चित्रपटाने यशाची पताका फडकवली आहे. मराठवाड्यातील २३ चित्रपटगृहांमध्ये ‘मिशन अयोध्या’ हाऊसफुल्ल होताना दिसला. अशाप्रकारचा प्रतिसाद मिळाल्याने स्थानिक वितरकांसह निर्मात्यांनीदेखील आनंद व्यक्त केला आहे. मराठवाड्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील लोणावळा येथेही ‘मिशन अयोध्या’चे दोन शो

अयोध्या

हाऊसफुल्ल झाले. या ठिकाणीही प्रेक्षकांनी चित्रपटाला जोरदार दाद दिली, ज्यामुळे या यशाचा दरवळ हळूहळू इतर भागांपर्यंत पोहोचत आहे.

मराठी संस्कृती, श्रद्धा आणि अयोध्येच्या ऐतिहासिक परंपरेचा उत्कृष्ट मिलाफ असलेल्या ‘मिशन अयोध्या’ने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. प्रभावी कथानक, दमदार अभिनय आणि दर्जेदार निर्मितीमुळे हा चित्रपट मराठी रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण करत असल्याचे निर्माते कृष्णा शिंदे, योगिता शिंदे आणि दिग्दर्शक समीर सुर्वे म्हणाले. हा चित्रपट आगामी दिवसांत महाराष्ट्रातील इतर ठिकाणीही अशीच लोकप्रियता मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content