Homeचिट चॅटतमिळींच्या स्वयंपाकगृहात मालवणी...

तमिळींच्या स्वयंपाकगृहात मालवणी खाद्यपदार्थ!

आपल्याला मुंबई, महाराष्ट्रात जगभरातील खाद्यपदार्थांची रेलचेल पाहण्यास मिळते. अनेक खाद्यसंस्कृती, परंपरा आपण स्वीकारत असल्याने जिभेवर रेंगाळणारे अद्भूत चवदार पदार्थ महाराष्ट्रात उपलब्ध होत असतात. परंतु आपले मराठमोळे खाद्यपदार्थ इतर राज्यात अभावानेच चाखायला मिळतात. तमिळनाडूतील ‘रेन ट्री’ या चेन्नईतील प्रसिद्ध पंचतारांकित रेस्तराँमध्ये आपल्या मालवणी खाद्यपदार्थांचा ७ दिवसांचा महोत्सव आयोजित करून महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा नुकताच सन्मान केला गेला.

महाराष्ट्रासाठी आणि खासकरून कोकण-मालवणसाठी ही अभिमानाची गोष्ट असून मुंबई, मालवण येथील ‘चैतन्य’ या अस्सल मालवणी खाद्यगृहाच्या सुरेखा वाळके आणि नितीन वाळके, सायली वाळके, प्रथमेश कुलकर्णी यांना हे श्रेय जाते. मालवणी खाद्यपदार्थांचा नुसता महोत्सव न करता आपले पदार्थ कसे बनवावेत? आणि कसे सर्व्ह करावेत? याचे प्रशिक्षणही तेथील प्रशिक्षित शेफना देऊन ते तमिळींना मालवणी पदार्थांचा लळा लावण्यात यशस्वी झाले आहेत.

मालवण ते मुंबई असा प्रवास करत घरगुती जेवणाला अस्सल मालवणी ते ऑथेंटिक मालवणी क्युझाईन अशी ओळख निर्माण करण्यापर्यंतची मजल मारत वाळके दाम्पत्याने ‘चैतन्य’ची ३० वर्षांपूर्वी स्थापना केली. आज यात एका नाविन्यपूर्ण गोष्टीची भर पडली आहे. चेन्नईच्या ‘रेन ट्री’ हॉटेलमध्ये तमिळ खाद्यप्रेमींसाठी आपल्या अस्सल चवीच्या मालवणी खाद्यपदार्थांच्या खास रेसिपी या महोत्सवात चैतन्य ग्रुपने सादर तर केल्याच परंतु तेथील प्रशिक्षित शेफना आपले पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षणही दिले. एक आठवडाभर चाललेल्या या महोत्सवाला खाद्यप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला. तमिळींनी नुसते आपले खाद्यपदार्थच स्वीकारले असे नसून त्यांनी आपल्या संस्कृती आणि परंपरेबद्दलही कमालीचा आदर व्यक्त केल्याचे दिसून आले.

द टेस्ट ञफ मालवण, या सात दिवसांच्या या मालवणी खाद्यमहोत्सवामध्ये पॉप-अप पद्धतीच्या कार्यक्रमात सेट मेनू म्हणजेच थाळी व बुफे अशा दोन्ही तऱ्हेने चेन्नईचे खाद्यरसिक मालवणी जेवणाचा आस्वाद घेत होते. मालवणी मसाल्यातील बटाटेवडे ते ओल्या काजूची उसळ, कुळथाची पिठी ते माश्याचं तिखलं, आमटी, भाजलेले मासे, भरलेले पापलेट, कोळंबीभात ते चिकन सागोती, वडे, भाकरी आणि मालवणी जेवणाची भैरवी सोलकढी अशी रेलचेल असलेले चविष्ट पदार्थ खाऊन ते तृप्त झाले. तमिळी अस्सल खवय्यांचा मिळालेला प्रतिसाद मालवणी खाद्यपदार्थांचा लौकिकार्थाने सन्मान वाढवत असून परराज्यातील खवय्यांना तृप्त करण्याची ‘चैतन्य’ला संधी प्राप्त झाली, हा अनुभव परकाया प्रवेशासारखा होता असे सुरेखा वाळके सांगतात.

Continue reading

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे...

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...
Skip to content