Homeचिट चॅटराष्ट्रीय बीच कबड्डीकरीता...

राष्ट्रीय बीच कबड्डीकरीता महाराष्ट्राचे संघ जाहीर

बिहार येथील बुद्धगया येथे होणाऱ्या ११व्या पुरुष व महिला राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने आपले दोन्ही संघ जाहीर केले आहेत. पुणे शहराच्या आम्रपाली गलांडे हिच्याकडे महिला संघाचे तर नाशिक शहरच्या आकाश शिंदे ह्याच्याकडे पुरुष संघाचे नेतृत्त्व सोपविण्यात आले आहे. भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने बिहार राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने ९ ते ११ ऑगस्टदरम्यान या स्पर्धा होतील.

महिला संघ:- १) निकिता पडवळ (पुणे ग्रामीण), १)आम्रपाली गलांडे (पुणे शहर), ३) समरीन बुरोंडकर (रत्नागिरी), ४) हरजित कौर संधू (मुंबई उपनगर पूर्व), ५) जुईली मिस्किटा (पालघर), ६) दिव्या गोगावले (पिंपरी-चिंचवड).

प्रशिक्षक:- संतोष शिर्के.  व्यवस्थापिका:- डॉ. विद्या हनुमंते (पाठारे).

पुरुष संघ:- १)अक्षय सुर्यवंशी (पुणे ग्रामीण), २) शंकर गदई (छ. संभाजी नगर), ३) सुनील दुबिले (पुणे शहर), ४)आकाश रुडले (मुंबई उपनगर पूर्व), ५) आकाश शिंदे (नाशिक शहर), ६) ऋषिकेश भोजने (पुणे ग्रामीण).

प्रशिक्षक:- प्रताप शेट्टी.  व्यवस्थापक:- सागर गोळे.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content