Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्रातले 2020 ते...

महाराष्ट्रातले 2020 ते 22पर्यंतचे कृषी पुरस्कार जाहीर!

महाराष्ट्रातल्या सन 2020, 2021 व 2022 करिता कृषी विभागामार्फत देण्यात येणारे शेतकरी व शेतीशी संबंधित संस्था यांचा सन्मान करणाऱ्या शासकीय पुरस्कारांची काल घोषणा करण्यात आली. त्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या कृषी व कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी व तत्सम संस्थांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी व सर्वसाधारण गट), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषिरत्न पुरस्कार (मंत्रालय स्तर) असे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

सन 2020पासून कोरोनाच्या संकटाच्या काळात या पुरस्कारांच्या वितरणात खंड पडला होता. दरम्यान धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून या तीनही वर्षातील कृषी विभागाच्या पुरस्कारांचे वितरण करण्याबाबत ते आग्रही होते. त्यानुसार सन 2020, 2021 व 2022 मधील पुरस्कारांची विभागनिहाय घोषणा करण्यात आली आहे.

कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांच्या सोबतीने प्रोत्साहनपर रक्कम दिली जाते, त्या रकमेतही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतीच तब्बल चार पटीने वाढ केली आहे. लवकरच या पुरस्कारांचे शासन स्तरावर कार्यक्रम आयोजित करून वितरण करण्यात येणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

ही आहे पुरस्कार व पुरस्कार्थींची यादी-

Continue reading

नोबेल शांतता पुरस्काराच्या शर्यतीत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प!

डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव आणि 'शांतता' हे दोन शब्द एकाच वाक्यात येणे अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का असू शकतो. पण जागतिक राजकारणात सध्या हीच चर्चा रंगली आहे. जगभरातील भिंतींवर आणि चर्चेत ट्रम्प यांचे नाव 'कोरले' जात असतानाच, आता त्यांच्या समर्थकांनी आणि...

अरागची ओमानला रवाना, अमेरिकेबरोबरची चर्चा हवेतच!

अमेरिकेबरोबर आम्ही आमच्या अटींवर चर्चा करण्यास तयार आहोत, अमेरिकेच्या नाही, असे इराणने आज पाकिस्तानात स्पष्ट केले. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी आज पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याबरोबर रावलपिंडीत झालेल्या चर्चेत आपल्या १० अटींचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावावर चर्चा...

केएल राहुलचा धमाका! आयपीएलमध्ये १५० धावा फटकावणारा पहिला भारतीय!!

आयपीएलच्या रणसंग्रामात शनिवारी क्रिकेट चाहत्यांना एका ऐतिहासिक आणि वादळी खेळीचा अनुभव आला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर केएल राहुलने पंजाब किंग्सच्या गोलंदाजांची अक्षरशः चाळण केली. आपल्या जुन्या संघाविरुद्ध खेळताना राहुलने केवळ धावांचा पाऊस पाडला नाही, तर आयपीएलच्या इतिहासात एका नव्या...
Skip to content