Homeएनसर्कलअंतिम श्वासापर्यंत काशी...

अंतिम श्वासापर्यंत काशी विश्वेश्वराच्या मुक्तीसाठी लढू!

उत्तर प्रदेशमधील काशी येथील ज्ञानवापी मशिदीत 16 मे 2022मध्ये शिवलिंग मिळाल्यापासून आम्ही सातत्याने त्याच्या मुक्तीसाठी लढा देत आहोत. या लढ्यात मुसलमान पक्षकार यशस्वी होणार नाहीत हे ज्ञात असल्याने, ते या याचिकेच्या संदर्भात अडथळे निर्माण करण्याचे कार्य करत आहेत. तसेच काही जणांना हाताशी धरून याचिका मागे घेतल्याच्या अफवा पसरवत आहेत. प्रत्यक्षात कोणतीही याचिका आम्ही मागे घेतलेली नाही आणि मी सर्वांना खात्री देतो की, जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत श्री काशी विश्वेश्वराच्या मुक्तीसाठी आम्ही लढत राहू, अशी ग्वाही ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ते आणि सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केले.

ते ‘श्रीरामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या दुसर्‍या दिवशी ‘मंदिर मुक्ती अभियान’ या सत्रात बोलत होते. काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसरात असलेल्या श्री श्रृंगारगौरी देवी, हनुमान, श्रीगणेश येथील देवतांची पूजा करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी आम्ही लढा देत आहोत. काशी विश्वेश्वराची मुक्ती होईल, तेव्हा देश अखंड हिंदु राष्ट्र होईल. काशी विश्वेश्वराच्या मुक्तीचे मोठे लक्ष्य घेऊन आपण मार्गक्रमण करत आहोत. यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊन या संपूर्ण परिसराच्या सर्वेक्षणाची मागणी लावून धरायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी अधिवक्ता नीलेश सांगोलकरयांनी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील श्री महालक्ष्मी मूर्तीच्या संदर्भातील सद्यस्थिती, तसेच कर्नाटक येथील सहकार संजीवनी रुग्णालयाचे डॉ. एन्. रमेश हासन यांनी चन्नकेवर मंदिरात कुराण वाचण्याच्या विरोधात दिलेल्या यशस्वी लढ्याची माहिती दिली. आंध्र प्रदेश येथील हिंदू उपाध्याय समितीचे संस्थापक अध्यक्ष महेश डेगला यांनीही मनोगत व्यक्त केले.

गंगाजलावर अधिक संशोधन होणे आवश्यक!

गंगा नदीमध्ये प्राणवायूची पातळी सर्वाधिक असून नदीत ‘बॅक्टेरिया फॉस’ नावाचा विषाणू असतो. त्यामुळे गंगाजल खराब होत नाही. कोरोनाकाळात गंगा नदीच्या किनार्‍यावरील शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण अन्य शहरांहून अल्प आढळले असून बरे होणार्‍यांची संख्याही अधिक आढळून आली आहे. केवळ कोरोनाच नाही, तर अन्य आजारही गंगेच्या पाण्याने बरे होऊ शकतात. त्यामुळे अशा गंगाजलावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे, असे मत अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अधिवक्ता अरुण गुप्ता यांनी व्यक्त केले.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content