Homeटॉप स्टोरीविशाळगड हिसांचारावरून काँग्रेसमध्ये...

विशाळगड हिसांचारावरून काँग्रेसमध्ये एकवाक्यता नाही?

कोल्हापूरच्या विशाळगडावर नुकत्याच झालेल्या हिंसाचाराबाबत राज्यातल्या काँग्रेसच्या दोन वेगवेगळ्या शिष्टमंडळांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतल्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे आमदार अस्लम शेख व अमिन पटेल यांनी काल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना शेख म्हणाले की, अनधिकृत बांधकामं तोडण्यासाठी नियम व कायदे आहेत. एका निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर एवढे अकांडतांडव करण्याची काय गरज आहे? छत्रपती शिवाजी महाराजांपासून  सबंध जग प्रेरणा घेते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन राज्यकारभार केला. मात्र आज त्याच शिवरायांच्या भूमित महिलांवर अत्याचार होत आहेत. पोलिसांना मारहाण होत आहे. जर पोलिसांचं खच्चीकरण  झाले तर जनतेने कोणाकडे अपेक्षेने बघायचे?

त्यानंतर विशाळगड हिंसाचारप्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्त्वाखाली एका शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात आमदार भाई जगताप, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी आमदार युसुफ अब्राहनी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा, प्रवक्ते निजामुद्दीन राईन, भरत सिंह होते.

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नसीम खान म्हणाले की, कोल्हापूर ही राजर्षी शाहू महाराजांची भूमी आहे. विशाळगडावरील घटनेने शाहू महाराजांच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम काही लोकांनी केले आहे. अतिक्रमणाच्या नावाखाली ४० ते ५० कुटुंबावर हल्ला करण्यात आला. या घटनेने राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेला आळा घालता आला असता. पण तसे प्रयत्न केल्याचे दिसत नाही. महाराष्ट्रात झुंडशाहीच्या बळावर दंगली घडवण्याचे हे कारस्थान आहे.

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content