Homeमाय व्हॉईसविश्वगुरूचे वैभव पुन्हा...

विश्वगुरूचे वैभव पुन्हा मिळवण्याकडे भारताची वाटचाल!

विश्वगुरू म्हणून आपले वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी भारत आपला मार्ग आखत आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल केले. यावेळी उपराष्ट्रपतींनी तरुण नेत्यांना भावी पिढ्यांसाठी असा एक मार्ग तयार करण्याचे आवाहन केले, जिथे आशा आकांक्षा आणि मनोधैर्य उंचावेल आणि त्याची प्रचिती आपल्या समृद्ध संस्कृतीची जपणूक करणाऱ्या समृद्ध भारतात दिसून येईल. आपण 2047च्या दिशेने वाटचाल करत असताना, स्वतः बद्दल विश्वास बाळगूया, कार्याला सुरुवात करूया, सहयोग वाढवूया आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बदल घडवणारे बनण्याची आकांक्षा बाळगूया, यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला.

जमशेदपूरमधील  एक्सएलआरआय–झेवियर स्कूल ऑफ मॅनेजमेंटला ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सोहळ्याला संबोधित करताना, उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांमध्ये जाणीवपूर्वक आणि कृती दोन्हींमधून आर्थिक राष्ट्रवाद आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहित करून तरुणांमध्ये “स्वदेश”ची भावना पुन्हा रुजवण्याची अत्यावश्यक गरज असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी उपराष्ट्रपतींनी स्वदेशचे अनेक फायदे स्पष्ट करून सांगितले यामध्ये परकीय चलनाचा साठा राखून ठेवण्यापासून ते उद्योजकतेला चालना देणे आणि रोजगाराच्या संधींना चालना देण्यापर्यंतच्या मुद्द्यांचा समावेश होता. अपयशाच्या भीतीपासून सावधगिरी बाळगत स्वतःला विकासाविरोधी आणि वृद्धीविरोधी म्हणून घेणे अतिशय नुकसानकारक असल्याचे सांगत उपराष्ट्रपती यांनी नमूद केले की, भीतीपोटी एखाद्या कल्पनेचा पाठपुरावा करण्यापासून स्वतःला दूर ठेवणे हे केवळ स्वत:वरच अन्याय केल्यासारखे होत नाही तर यामुळे मोठ्या प्रमाणावर मानवतेवरही अन्याय होतो.

हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे की यशाची मोजणी ही केवळ बोजड पुस्तके वाचून किंवा उत्कृष्टतेचे शेरे घेऊन होते असे नाही तर सतत नवनवीन शिकण्याची उत्कटता जोपासणे आणि समोर येणाऱ्या आव्हानांवर आपण कशा प्रकारे  मात करू शकतो यामधूनही यशाची मोजणी होत असते असेही उपराष्ट्रपतीनी सांगितले.

Continue reading

बहुभाषिक ॲक्शन चित्रपट ‘राजा शिवाजी’ महाराष्ट्रदिनी होणार प्रदर्शित!

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीने आज एक अत्यंत महत्वाकांक्षी घोषणा केली आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत, भव्य ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा 'राजा शिवाजी' हा चित्रपट येत्या महाराष्ट्रदिनी, १ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठी,...

पटकथेसाठीचे वनलाईनर गुंफून लिहिलेले ‘फिल्मी कथा’चे प्रकाशन

सुमारे ३० ते ३५ वनलाईनर एकत्र गुंफून अभिनेते आणि सिद्धहस्त लेखक प्रकाश राणे यांनी लिहिलेला "फिल्मी कथा" हा कथासंग्रह डिंपल प्रकाशनच्या वतीने अंधेरी येथे प्रकाशित करण्यात आला. या पुस्तकाचे प्रकाशन सुसंवादिनी मंगला खाडिलकर, निर्माती दिग्दर्शिका कांचन अधिकारी, अभिनेत्री गायिका रसिका धामणकर (अबोली मालिकेमधील...

‘कप बशी’त दिसणार पूजा सावंत आणि ऋषी मनोहर!

नवनवे प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत होत असतात. आता आगामी "कप बशी" या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उलगडणार असून सध्या मुंबईत या चित्रपटाचे चित्रिकरण...
Skip to content