Homeबॅक पेजलमीतीए युद्धसरावासाठी भारतीय...

लमीतीए युद्धसरावासाठी भारतीय लष्कराची तुकडी सेशेल्सकडे

‘लमीतीए-2024’, या संयुक्त युद्धसरावात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराच्या तुकडी काल सेशेल्सकडे (पूर्व आफ्रिकेतील एक देश) रवाना झाली. सेशेल्स संरक्षण दल आणि भारतीय लष्कर यांच्यादरम्यान दहाव्यांदा हा युद्धसराव होत आहे. आजपासून 27 मार्चपर्यंत सेशेल्समध्ये हा संयुक्त युद्धसराव केला जाणार आहे.

क्रेऑल भाषेत ‘लमीतीए’ या शब्दाचा अर्थ मैत्री असा होतो. लमीतीए हा द्वैवार्षिक प्रशिक्षणात्मक युद्धसराव 2001पासून सेशेल्समध्ये घेतला जातो. भारतीय लष्कराची गोरखा रायफल्स व सेशेल्स यांचे प्रत्येकी 45 जवान यामध्ये सहभागी होत आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या ‘शांतिसेना मोहीम सनदी’च्या सातव्या भागाअंतर्गत निमशहरी भागात अर्धपारंपरिक कारवायांदरम्यान परस्परांच्या क्षेत्रात कारवाई करण्याच्या क्षमता वाढवणे, हा या युद्ध सरावाचा उद्देश आहे. या सरावामुळे शांती मोहिमांच्या वेळी उभय पक्षांदरम्यान सहकार्य व परस्परांच्या क्षेत्रात कारवाई करण्याचे कौशल्य वाढीस लागणार आहे. उभय देशांच्या लष्करांदरम्यान द्विपक्षीय लष्करी संबंध वृद्धींगत होण्यास अनुभवांचे, कौशल्यांचे व चांगल्या कार्यपद्धतीचे आदानप्रदान होण्यासही या युद्धसरावामुळे हातभार लागणार आहे.

निमशहरी वातावरणात उत्पन्न होऊ शकणारे धोके लक्षात घेऊन त्यावर मात करण्यासाठी, प्रशिक्षण देऊन, नियोजन करून, डावपेच व कवायती या स्वरूपात दोन्ही पक्ष संयुक्तपणे त्याची अंमलबजावणी करतील. या 10 दिवसीय संयुक्त युद्धसरावात क्षेत्रीय प्रशिक्षण कार्यक्रम, लढाईविषयक चर्चा, व्याख्याने व सादरीकरणे समाविष्ट असून दोन दिवसांच्या सांगता समारंभाने त्याचा समारोप होईल.

Continue reading

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...

पेट्रोल-डिझेलची दरवाढ अटळ?

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि मध्य-पूर्वेतील तणावामुळे भारतातील सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांच्या तोट्यात मोठी वाढ झाली आहे. इंडियन ऑईल, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांसारख्या कंपन्यांना सध्या दरमहा सुमारे ३०,००० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे....
Skip to content