Homeबॅक पेजलमीतीए युद्धसरावासाठी भारतीय...

लमीतीए युद्धसरावासाठी भारतीय लष्कराची तुकडी सेशेल्सकडे

‘लमीतीए-2024’, या संयुक्त युद्धसरावात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराच्या तुकडी काल सेशेल्सकडे (पूर्व आफ्रिकेतील एक देश) रवाना झाली. सेशेल्स संरक्षण दल आणि भारतीय लष्कर यांच्यादरम्यान दहाव्यांदा हा युद्धसराव होत आहे. आजपासून 27 मार्चपर्यंत सेशेल्समध्ये हा संयुक्त युद्धसराव केला जाणार आहे.

क्रेऑल भाषेत ‘लमीतीए’ या शब्दाचा अर्थ मैत्री असा होतो. लमीतीए हा द्वैवार्षिक प्रशिक्षणात्मक युद्धसराव 2001पासून सेशेल्समध्ये घेतला जातो. भारतीय लष्कराची गोरखा रायफल्स व सेशेल्स यांचे प्रत्येकी 45 जवान यामध्ये सहभागी होत आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या ‘शांतिसेना मोहीम सनदी’च्या सातव्या भागाअंतर्गत निमशहरी भागात अर्धपारंपरिक कारवायांदरम्यान परस्परांच्या क्षेत्रात कारवाई करण्याच्या क्षमता वाढवणे, हा या युद्ध सरावाचा उद्देश आहे. या सरावामुळे शांती मोहिमांच्या वेळी उभय पक्षांदरम्यान सहकार्य व परस्परांच्या क्षेत्रात कारवाई करण्याचे कौशल्य वाढीस लागणार आहे. उभय देशांच्या लष्करांदरम्यान द्विपक्षीय लष्करी संबंध वृद्धींगत होण्यास अनुभवांचे, कौशल्यांचे व चांगल्या कार्यपद्धतीचे आदानप्रदान होण्यासही या युद्धसरावामुळे हातभार लागणार आहे.

निमशहरी वातावरणात उत्पन्न होऊ शकणारे धोके लक्षात घेऊन त्यावर मात करण्यासाठी, प्रशिक्षण देऊन, नियोजन करून, डावपेच व कवायती या स्वरूपात दोन्ही पक्ष संयुक्तपणे त्याची अंमलबजावणी करतील. या 10 दिवसीय संयुक्त युद्धसरावात क्षेत्रीय प्रशिक्षण कार्यक्रम, लढाईविषयक चर्चा, व्याख्याने व सादरीकरणे समाविष्ट असून दोन दिवसांच्या सांगता समारंभाने त्याचा समारोप होईल.

Continue reading

मी हरलेच नाही, मग राजीनामा का देऊ? ममतांचा सवाल!

मी हरलेच नाही तर मग राजीनामा कशासाठी देणार, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. मी हरलेच नाही. मला हरवले गेले आहे. त्यामुळे लोकभवन म्हणजेच राजभवनावर जाऊन मी राजीनामा देणार...

दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करणारी महिला झाली आमदार!

जिद्द, चिकाटी आणि लोकशाहीवरचा विश्वास असेल, तर एखादी सामान्य व्यक्ती किती मोठी झेप घेऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कलिता माजी. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गजांचा पराभव झाला असला, तरी औसग्राम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या...

इराणने युद्धविराम तोडला!

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आज अखेर इराणने तोडला. इराणने आज होर्मूझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेवरच हल्ला केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची ही युद्धनौका इराणच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता इराणने या...
Skip to content