Homeब्लॅक अँड व्हाईटदंगे केलेत तर...

दंगे केलेत तर धंदे काढलेच समजा..

अयोध्येत राममंदिर झाले. त्याचसोबत अयोध्येत बाबरी मशीदीचेही काम सुरू आहे. हे कधी ते लोक सांगत नाहीत. मात्र मुस्लिम समाजाच्या मतांसाठी व्हॉट्सएपच्या माध्यमातून मेसेज केले जातात. सामाजिक सामंजस्य जपणारे आम्ही आहोत. परंतु कुणी कुणाच्या नावाने दंगा करण्याचा प्रयत्न करतील तर त्यांचे धंदे काढायला मला वेळ लागणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व रायगड लोकसभा मतदारसंघातले उमेदवार सुनील तटकरे यांनी दिला.

सामाजिक सलोखा ज्यांना बघवत नाही ते धर्माधर्मामध्ये, जातीजातीमध्ये मतांच्या बेगमीसाठी अंतर निर्माण करत आहेत, असे ते महाड शहरातील प्रचारसभेत सोमवारी केले. फाळणी होत असताना शेजारच्या देशात गेले त्यांना मातृभूमीत परत यायचे असेल तर त्यांच्या वास्तव्याची अट शिथिल करणारा सीएएचा कायदा आहे. या देशातील राष्ट्रभक्त मुस्लिमांमध्ये चुकीचे काही घडणार नाही. माझे आवाहन आहे, उद्धव ठाकरे, अनंत गीते यांना.. की त्यांनी सीएए कायदा काय आहे हे जनतेला सांगावे. पण समाजासमाजामध्ये जाणीवपूर्वक अंतर निर्माण करण्याचा प्रयत्नही जातीयवादी मंडळी करत आहेत, असेही ते म्हणाले.

व्हॉट्सएप मेसेजच्या निमित्ताने आमच्यामध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर या परिसरातील, देशातील, राज्यातील मुस्लिम समाजाने आमचा धर्मनिरपेक्ष विचार बघावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समानता दिली. त्यामुळेच या देशामध्ये लोकशाही व्यवस्था जिवंत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या या राजधानीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक हुंकार महाडच्या नगरीमधून दिला. आज तिथे सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम होतेय, असेही सुनील तटकरे म्हणाले.

आपले उमेदवार किती लाख मतांनी विजयी होणार आहे हेच चित्र स्पष्ट व्हायचे आहे. त्यामुळे येत्या ७ मे रोजी तटकरे यांना मोठया मतांनी विजयी करा असे आवाहन पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना जशी सलामी दिली जाते तशी सलामी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही चवदार तळ्यावरील पुतळ्यासमोर देण्यास सुरूवात केली आहे. इतकी वर्षे अनंत गीते का असे काम करु शकले नाही, असा सवाल आमदार भरत गोगावले यांनी केला.

  

तटकरेंना देशाच्या हितासाठी निवडून द्यायचे आहे. या रायगडचा मावळा केंद्रात मंत्री झाला पाहिजे असे आवाहनही आमदार भरत गोगावले यांनी केले. अमोल मिटकरी, अदिती तटकरे यांचीही यावेळी भाषणे झाली.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content