Homeन्यूज अँड व्ह्यूजदिनोने तोंड उघडले...

दिनोने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया…

कामं देताना यांना दिनू मोरे दिसला नाही, पण दिनो मोरिया दिसला आणि आता त्या दिनोने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी आज विधानसभेत शिवसेना (उबाठा)वर टीका केली. कोरोना काळात कापड दुकानदार आणि हॉटेलवाल्याला कोरोना सेंटर देणाऱ्यांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करू नयेत, अशा शब्दांतही त्यांनी उबाठा नेत्यांना खडे बोल सुनावले.

राईट टू रिप्लायच्या अधिकारावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी घोषणायुद्ध सुरू केल्याने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. नियम २९३ची चर्चा सुरू करताना विरोधकांकडून चर्चा सुरू करणारे आमदार आदित्य ठाकरे यांनाच राईट टू रिप्लायच्या अंतर्गत भाषण करता येईल, अशी नियमात तरतूद आहे. त्यामुळे आमदार भास्कर जाधव यांना राईट टू रिप्लायच्या अंतर्गत भाषण करता येणार नाही, असा निर्वाळा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिला. त्यावर जाधव यांनी हरकत घेतली. त्यानंतर सभागृहात दोन्ही बाजूंच्या आमदारांनी गदारोळ केला.

दिनो

विधानसभेतील चर्चेला सविस्तर उत्तर देताना शिन्दे यांनी महायुती सरकारने केलेल्या विविध क्षेत्रांमधील कामांचा आढावा घेतला. गेली पंचवीस वर्षे मुंबईला आणि मुंबई महापालिकेला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजून त्यांनी राज्य केले, अशी टिप्पणीही त्यांनी केली. मुंबईतील गिरणी कामगारांना घरे देण्याचा विषय असो की कापड गिरण्यांच्या जागेवरील पुनर्विकास, युती शासनाने या सर्व घटकांना घरे देण्यासाठी विविध योजना आणल्या. पायाभूत सुविधा वाढवताना अटल सेतू असो की नव्या विमानतळाला जोडणारी मेट्रो असो, युती सरकारने पायाभूत सुविधांचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढवले आहे, याकडेही शिन्दे यांनी लक्ष वेधले.

स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा, अशा शब्दांत त्यांनी शिवसेना उबाठाची खिल्ली उडवली. शिन्दे यांचे भाषण सुरू असताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेन्द्र आव्हाड सभागृहात आले. त्याकडे निर्देश करत शिन्दे म्हणाले की, आव्हाड आता आलेत, त्यांना विचारा. त्यांच्या फायलींवर मी लगेच सह्या करायचो की नाही ते… त्यावर आव्हाड उठून म्हणाले, माझ्या एका फायलीवर तर या माणसाने रात्री साडेतीन वाजता सही केली. त्यावर शिन्दे म्हणाले, केली ना… शिन्दे बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार जागेवरून उठले आणि आव्हाड यांना उद्देशून म्हणाले, अहो त्याला रात्री साडेतीन नाही, पहाटे साडेतीन म्हणतात… असे हसत हसत म्हणत अजित पवार सभागृहातून बाहेर गेले आणि सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.

दिनो

मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक झाल्यावर अर्ध्या तासाने प्रवासाचा वेळ वाचणार असून दरमहा एक कोटी रुपये इंधनापोटी वाचणार आहेत, असेही शिन्दे यांनी सांगितले. मुंबईतला मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला त्यावेळी या लोकांनी त्यांच्यासाठी काहीही केले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. पायऱ्यांवर आंदोलने करण्यापेक्षा सभागृहात या आणि प्रश्नांची उत्तरे घ्या, असं विरोधकांना सुनावून शिन्दे म्हणाले की, आम्ही बघतो.. पाहतो.. असे न सांगता किंवा अडवून दाखवतो, अशी वृत्ती न ठेवता आम्ही करून दाखवतो. खोट्या आरोपांचा सिलसिला सुरू ठेवलात तर लोक तुम्हाला विरोधी पक्ष असे म्हणण्याऐवजी विनोदी पक्ष म्हणून संबोधू लागतील, असंही शिन्दे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

व्हेरिफिकेशनसाठीचे अर्थपूर्ण कागद…

पडताळणी किंवा व्हेरिफिकेशनची प्रमाणित कार्यपद्धती म्हणजेच स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अस्तित्त्वात असली तरी काही विशिष्ट कागदपत्रे दिल्यानंतर ही पडताळणी कशी वेगाने होते, हे सर्वांना माहीत आहे, अशी टिप्पणी शिवसेना (उबाठा)चे आमदार सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केली आणि संपूर्ण सभागृह...

शनिशिंगणापूरच्या देवस्थानालाच शनिपीडा…

शनिचा कोप झाला तर भल्याभल्यांची त्रेधातिरपीट उडते, असे शनिकृपा किंवा शनिकोपावर विश्वास असलेले सांगतात. पण, प्रत्यक्ष शनिवरच शनिपीडा होण्याची वेळ आली तर... प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानमधील मंडळींनी सरेआम लूट करत देवस्थानच्या तिजोरीवर डल्ला मारला आहे आणि देवस्थानवरच शनिपीडा आणली आहे,...

सुधीरभाऊंचे स्थान मुख्यमंत्री फडणवीसांच्या मनःपटलावर खूप वरचे!

सुधीरभाऊ यांचे स्थान आमच्या मनःपटलावर खूप वरचे आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या कर्तृत्त्वाच्या योग्यतेची जागा दिली जाईल. नुसतेच भत्ते दिले जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी टिप्पणी केली की, मुख्यमंत्रीमहोदय तुम्ही...
Skip to content