Homeपब्लिक फिगरप्रकल्प रद्द करायला...

प्रकल्प रद्द करायला मी काही उद्धव ठाकरे नाही!

प्रकल्प स्थगित करायला मी काही उद्धव ठाकरे नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा)चे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरील भाषणांना उत्तर देताना फडणवीस बोलत होते. गेल्या काही दिवसांत प्रकल्प स्थगितीच्या बातम्या माध्यमांमधून येत आहेत, याकडे लक्ष वेधून फडणवीस म्हणाले की, प्रकल्प स्थगित करायला मी काही उद्धव ठाकरे नाही. त्यांच्या या वाक्यावर सत्ताधारी महायुती सरकारच्या घटक पक्षांमधील सदस्यांनी बाके वाजवून दाद

ठाकरे

दिली. स्थगिती दिले जात असलेले प्रकल्प कशामुळे स्थगित केले जातात, याबद्दल फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षातील सदस्यांनाही ही गोष्ट माहीत आहे की आपण अनेकदा प्रकल्प करतो. पण त्यात काही बाबी नंतर आढळून येतात. त्यामुळे त्याबद्दल निर्णय घ्यावे लागतात.

याआधीच्या एकनाथ शिन्दे यांच्या नेतृत्त्वातील सरकारमधील काही निर्णयांबद्दल ते म्हणाले की, काही निर्णयांबद्दल स्थगिती दिली आहे आणि प्रत्येक स्थगिती मुख्यमंत्री म्हणून मी दिलेली नाही. काही प्रकल्पांमधे विभागीय आयुक्त पातळीवर किंवा काही प्रकल्पांसंदर्भात केंद्राच्या निकषांमधील बदलांमुळे स्थगिती द्यावी लागली आहे. पण तरीही प्रत्येक निर्णयाच्या वेळी फडणविसांचा शिन्दे यांना दणका, अशा बातम्या दिल्या जातात. प्रकल्प रद्द करत सुटायला मी काही उद्धव ठाकरे नाही आणि शिन्दे यांच्या नेतृत्त्वातील सरकारमध्ये झालेल्या प्रत्येक प्रकल्पात मी आणि अजित पवारही सहभागी होतो. त्यामुळे ती सामूहिक जबाबदारीच होती आणि आजही आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Continue reading

खेडच्या सणघरमध्ये माजी सैनिकाचा संशयस्पद मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील सणंघर गाव! तालुक्यापासूनदूरवर शांत गाव, आजूबाजूला हिरवी झाडे-झूडपे, वस्ती बहुतेक मोरे मंडळींची, इकडेही मोरे आणि तिकडेही मोरेच! घरे मध्यम आकाराची पण प्रशस्त. या मोरे वस्तीचे विशेष म्हणजे जणू सर्वच मोरे सरकारी नोकर, कुणी पोलीस खात्यात...

केरळवासियांना काल नव्याने मिळाली ‘मोदींची गॅरंटी’!

केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, २९ मार्च रोजी पलक्कड आणि त्रिशूरमध्ये धडाकेबाज प्रचारदौरा केला. पारंपारिक पांढरा 'मुंडू' (धोतर) आणि कुर्ता अशा मल्याळी पेहरावात आलेल्या पंतप्रधानांचे केरळमध्ये अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. ९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी...

मुंबईत १ एप्रिलपासून चालणार ‘वृक्ष संजीवनी’ अभियान

मुंबई महापालिकेमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक ठिकाणांवरील वृक्षांच्या संवर्धनासाठी ‘वृक्ष संजीवनी’ अभियान राबविण्यात येत आहे. जागतिक वसुंधरा दिन (२२ एप्रिल) निमित्ताने १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६, या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या एकूण २९...
Skip to content