Homeकल्चर +मुंबईतल्या अध्यात्मरंग महोत्सवास...

मुंबईतल्या अध्यात्मरंग महोत्सवास भरघोस प्रतिसाद

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे गेली वीस वर्षे ‘अध्यात्मरंग महोत्सव’ आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत अनेक विचारवंतांची व्याख्याने, किर्तने, प्रवचने सादर करण्यात आली. यंदाही हा महोत्सव उत्साहात साजरा झाला. या वर्षी या महोत्सवात ‘आनंदवारी-नर्मदा आणि पंढरी’ या शीर्षकाखाली २ व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. श्रोत्यांनी या दोन्ही व्याख्यानांना उत्तम प्रतिसाद दिला.

उदयन् आचार्य यांचे ‘नर्मदा परिक्रमा-एक आनंदयात्रा’ या विषयावर व्याख्यान झाले. परिक्रमेतील त्यांचे अनुभव त्यांनी ओघवत्या शैलीत सांगितले. ते म्हणाले की, परिक्रमा ही एकट्याने करायची असते आणि वारी अनेकांना बरोबर घेऊन करायची असते. परिक्रमा कठीण असून परिक्रमा करणाऱ्यांची नितांत श्रद्धा असली तरच नर्मदामैया काळजी घेते असा अनुभव आहे. त्यांच्या व्याख्यानातून श्रोत्यांना परिक्रमेचा अनुभव घेतल्याचा आनंद मिळाला. उदयन् आचार्य यांनी स्वतः ३ वेळा परिक्रमा केली असून आता नर्मदा तटावरील महेश्वर येथील सप्तमातृका मंदिरात वर्षातील बराच काळ वास्तव्य करून परिक्रमावासींची सेवा करतात.

सुधीर महाबळ यांनी ‘एक तरी वारी अनुभवावी’ या विषयावर पंढरपूर वारीचे आणि परतवारीचे आपले अनुभव कथन केले. शहरात वाढलेल्या त्यांना अत्यंत भाविक असलेल्या खेडुतांबरोबरचे हृद्य अनुभव खूप काही शिकवून गेले असं ते म्हणाले. वारीची पदयात्रा ही अतिशय शिस्तबद्ध आणि आखीव असते. महाबळांनी सांगितलं की, ही या लाखो वारकऱ्यांची स्वयंशिस्त आहे. वारी म्हणजे ऐश्वर्यवारी आणि परतवारी म्हणजे वैराग्यवारी असंही ते सांगतात. ते स्वतः गेली अनेक वर्षं वारी आणि परतवारी श्रद्धापूर्वक करतात.

Continue reading

मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणारे पत्रकार अभय मोकाशींचे निधन

इंग्रजी पत्रकारितेत आपल्या शोधपत्रकारितेचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे काल, शनिवारी रात्री उशिरा मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील श्रीकृष्ण नगरातील डॉ. अनिता मयेकर यांच्या माऊली इस्पितळात निधन झाले. वयाच्या ६९व्या वर्षात पदार्पण करण्यास जेमतेम एक तास उरला असताना...

अवघ्या दोन तासांतच गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी मातीमोल!

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुरुवारचा दिवस उजाडताच अत्यंत पडझडीचा ठरला आहे. कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी ९ वाजल्यापासूनच 'भूकंप'सदृश स्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे सुमारे ९ लाख कोटी रुपये मातीमोल झाले....

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ‘वेपिंग’ करताना कॅमेऱ्यात कैद!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सने मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला असला, तरी सध्या चर्चा मात्र त्यांच्या विजयाची नाही, तर कर्णधार रियान परागच्या एका वादग्रस्त कृत्याची होत आहे. ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असताना रियान पराग 'वेपिंग' (ई-सिगारेटचा...
Skip to content