Tuesday, February 4, 2025
Homeन्यूज ॲट अ ग्लांसविनेश फोगटच्या अपिलावर...

विनेश फोगटच्या अपिलावर आज सुनावणी

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने केलेल्या मागणीनुसार तिला प्ररिसमधल्या ऑलिम्पिक स्पर्धेतले रौप्यपदक द्यायचे की नाही यावर पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादापुढे आज दुपारी दीड वाजता सुनावणी होण्याची शक्यता आहे.

पॅरिस ऑलम्पिकमध्ये कुस्तीच्या आखाड्यात फायनलमध्ये १०० ग्रॅम वजन जास्त भरल्यानंतर विनेशला अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर तिने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे अपील करत आपल्याला संयुक्तपणे रौप्यपदक द्यावे, अशी मागणी केली आहे. रौप्यपदकाच्या सामन्यापर्यंत प्रत्येक सामन्यात आपले वजन

विनेश

निर्धारीत वजनापेक्षा जास्त नव्हते. त्यामुळे आपण फायनलमध्ये मिळवलेले स्थान वैध आहे. हे लक्षात घेता आपल्याला फक्त फायनलसाठी अपात्र ठरविण्यात यावे आणि आपल्याला संयुक्तपणे रौप्यपदक देण्यात यावे, अशी मागणी विनेशने केली आहे. यावर आज सुनावणी अपेक्षित असून तिला रौप्यपदक मिळणार का, याकडे साऱ्या भारतीयांचे लक्ष लागले आहे. ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे विनेशची बाजू लवादापुढे मांडणार असल्याचे कळते.

अपात्र ठरविली गेल्यानंतर विषण्ण मानसिकतेतच विनेश फोगटने काल कुस्तीला रामराम करत आंतरराष्ट्रीय कुस्तीतून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. एक्सवर ट्विट करत तिने ही घोषणा केली. आईला उद्देश्यून केलेल्या ट्विटमध्ये तिने कुस्ती जिंकली, मी हरले.. असे म्हटले आहे.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

श्री मावळी मंडळाच्या खो-खो स्पर्धेत ज्ञानविकास,विहंग विजयी

ठाण्यातील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रथम विभागीय खो-खो स्पर्धेच्या महिला गटात ज्ञानविकास फाउंडेशन संघ (ठाणे) व पुरुष गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे) या संघांनी विजेतेपद पटकावले. महिला गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या ज्ञानविकास फाउंडेशन संघाने ठाण्याच्या रा....

महाराष्ट्रात सुरू होणार देशातले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ

महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असे राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. नवे विद्यापीठ AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला...

शेअर बाजारात पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात!

बजेटनंतरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहारात पहिल्या अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. त्यामुळे या पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले. कार्पोरेट क्षेत्राची बजेटने निराशा केल्याचे मानले जात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अपेक्षित गुंतवणूक न...
Skip to content