Homeचिट चॅटआशियाई पॉवरलिफ्टिंगमध्ये गायत्री...

आशियाई पॉवरलिफ्टिंगमध्ये गायत्री बडेकरची सुवर्णमय कामगिरी

उत्तराखंडच्या डेहराडून येथे नुकत्याच झालेल्या आशियाई सबज्युनिअर, ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत सब ज्युनिअर महिलांच्या गटात आय .एन.डी. वेटलिफ्टिंग – पॉवरलिफ्टिंग क्लब, कर्जतची खेळाडू गायत्री आशा महेश बडेकर हिने ४३ किलो वजनी गटात शानदार सुवर्णमय कामगिरी केली. स्कॉट, बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट या प्रकारात तिने जुने आशियाई विक्रम मोडून नवीन विक्रम आपल्या नावे केले. तसेच तिन्ही प्रकारात ३२५ किलो सर्वाधिक वजन उचलून नवीन विक्रम नोंदवला.

सध्याची आशिया खंडातली तसेच भारतातील एकमेव पॉवरलिफ्टर जिने स्कॉट, बेंच आणि डेडलिफ्ट आणि एकूण असे एकाचवेळी चारही प्रकारात नवे विक्रम केले. कर्जत येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेल्या गायत्रीला राष्ट्रीय कुस्ती वेटलिफ्टिंग आणि पॉवरलिफ्टिंग खेळाडू हनुमंत खरात (वन विभाग, महाराष्ट्र शासन) यांचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन लाभले.
तसेच सरावासाठी अंजली येवले आणि प्रथमेश भालेकर यांचे सहकार्य मिळाले. ऑर्किड कॉलेज कशेळे, कर्जतची विद्यार्थिनी असलेल्या या मुलीने पहिल्याच प्रयत्नात सबज्युनिअर स्पर्धेत भारतीय संघातर्फे भाग घेऊन ४ सुवर्णपदके प्राप्त केली. याअगोदर रायगडच्या सलोनी मोरे ,अमृता भगत यांनी आंतरराष्ट्रीय पदके जिंकली होती.

महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त संजय सरदेसाई, पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे अध्यक्ष गिरीश वेदक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गायत्रीचे गायत्रीचे अभिनंदन केले आहे.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content