Homeमुंबई स्पेशलमुंबईतली उद्याने, मैदाने,...

मुंबईतली उद्याने, मैदाने, चौपाट्या रात्री १० वाजेपर्यंत खुल्या!

कोविड-१९ संसर्ग परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर, जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व उद्याने, मैदाने, चौपाट्या आणि समुद्रकिनारे आता सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत नागरिकांसाठी खुले राहणार आहेत.

उद्याने

सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता यासह आवश्यक सर्व निर्देशांचे पालन करून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे  आवाहन पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केले आहे.

उद्याने

मुंबई महानगरातील कोविड-१९ संसर्ग स्थिती सध्या नियंत्रणात आहे. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेदरम्यान महापालिका प्रशासनाच्या प्रयत्नांसह मुंबईकर नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे  संसर्ग स्थितीवर नियंत्रण आणणे शक्य झाले. कोविडवर नियंत्रण आणल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी मिशन ब्रेक दी चेनमध्ये टप्प्याटप्प्याने उपाययोजना करून जनजीवन पूर्ववत खुले केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई महानगरातील ८६० उद्याने, ३१८ मैदाने, चौपाट्या आणि समुद्रकिनारे आता सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत खुली राहतील, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे आणि उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

उद्याने

सार्वजनिक ठिकाणांवर वावरताना गर्दी न करता सुरक्षित अंतर राखणे महत्त्वाचे आहे. त्यासोबत प्रत्येकाने मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. जंतुनाशक द्रव्य (sanitizer) किंवा साबण आणि पाण्याने हातांची नियमित स्वच्छता राखणेदेखील आरोग्यासाठी हिताचे आहे. त्यामुळे नागरिकांनी या सर्व बाबींचे योग्य पालन करून पालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोविड प्रतिबंधक निर्देशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

उद्याने

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content