Homeकल्चर +पटकथेसाठीचे वनलाईनर गुंफून...

पटकथेसाठीचे वनलाईनर गुंफून लिहिलेले ‘फिल्मी कथा’चे प्रकाशन

सुमारे ३० ते ३५ वनलाईनर एकत्र गुंफून अभिनेते आणि सिद्धहस्त लेखक प्रकाश राणे यांनी लिहिलेला “फिल्मी कथा” हा कथासंग्रह डिंपल प्रकाशनच्या वतीने अंधेरी येथे प्रकाशित करण्यात आला. या पुस्तकाचे प्रकाशन सुसंवादिनी मंगला खाडिलकर, निर्माती दिग्दर्शिका कांचन अधिकारी, अभिनेत्री गायिका रसिका धामणकर (अबोली मालिकेमधील रमा) कवयित्री साहित्यिका लता गुठे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमास डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळ्ये उपस्थित होते.

प्रास्ताविक भाषणात अशोक मुळ्ये यांनी पुस्तकाविषयी व प्रकाशन संस्थेविषयी रोचक माहिती उपस्थितांना दिली. रसिका धामणकर यांनी आपल्या छोटेखानी भाषणात, प्रकाश गजानन राणे यांच्या लेखनशैलीवर प्रकाश टाकला. कांचन अधिकारी यांनी आपल्या भाषणात, राणे यांच्या स्वभावाचे पैलू उलगडून दाखविले. प्रकाश राणे, भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडीचे मुंबई विभागाचे सहसंयोजक असून, केंद्रीय सेन्सॉर बोर्डाचे सल्लागारदेखील आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. मंगला खाडिलकर यांनी आपल्या भाषणात फिल्मी कथा, या पुस्तकावर प्रकाश टाकत, त्यातील काही कथांवर विवेचन केले. राणे यांच्या लेखनशैलीवर विस्तृत टिप्पणीही त्यांनी केले. राणे यांनी आपल्या मनोगतात सर्वांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचे निवेदन प्रथितयश निर्माती व निवेदिका, अक्षदा भालेकर-विचारे यांनी केले. लीना रेडकर यांनी स्वागतपर भाषण व आभार प्रदर्शन केले.

चित्रपटासाठी ज्या कथा लिहिल्या जातात, त्या संक्षिप्त स्वरूपात असतात आणि त्यांना वन लाईनर असे म्हणतात. ही वनलाईनर चित्रपटासाठी निश्चित झाल्यानंतर, त्या वनलाईनरचा विस्तार होऊन, चित्रपटांची कथा तयार होते. थोडक्यात म्हणजे चित्रपटाचे कथा बीज आणि ठळक मुद्दे या वनलाईनरमध्ये असतात. वनलाईनर वाचून कथेचा सार व सारांश लक्षात येतो. अशा वनलाईनर चित्रपट निर्मात्यांना ऐकवायची प्रथा आहे. कुणी लेखक एका वेळेला दोन ते तीन वन लाईनर निर्मात्याला ऐकवू शकतो. अशा या कथांचे हे पुस्तक आहे. 

Continue reading

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...

मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर!

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्ष...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...
Skip to content