Homeकल्चर +पटकथेसाठीचे वनलाईनर गुंफून...

पटकथेसाठीचे वनलाईनर गुंफून लिहिलेले ‘फिल्मी कथा’चे प्रकाशन

सुमारे ३० ते ३५ वनलाईनर एकत्र गुंफून अभिनेते आणि सिद्धहस्त लेखक प्रकाश राणे यांनी लिहिलेला “फिल्मी कथा” हा कथासंग्रह डिंपल प्रकाशनच्या वतीने अंधेरी येथे प्रकाशित करण्यात आला. या पुस्तकाचे प्रकाशन सुसंवादिनी मंगला खाडिलकर, निर्माती दिग्दर्शिका कांचन अधिकारी, अभिनेत्री गायिका रसिका धामणकर (अबोली मालिकेमधील रमा) कवयित्री साहित्यिका लता गुठे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमास डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळ्ये उपस्थित होते.

प्रास्ताविक भाषणात अशोक मुळ्ये यांनी पुस्तकाविषयी व प्रकाशन संस्थेविषयी रोचक माहिती उपस्थितांना दिली. रसिका धामणकर यांनी आपल्या छोटेखानी भाषणात, प्रकाश गजानन राणे यांच्या लेखनशैलीवर प्रकाश टाकला. कांचन अधिकारी यांनी आपल्या भाषणात, राणे यांच्या स्वभावाचे पैलू उलगडून दाखविले. प्रकाश राणे, भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडीचे मुंबई विभागाचे सहसंयोजक असून, केंद्रीय सेन्सॉर बोर्डाचे सल्लागारदेखील आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. मंगला खाडिलकर यांनी आपल्या भाषणात फिल्मी कथा, या पुस्तकावर प्रकाश टाकत, त्यातील काही कथांवर विवेचन केले. राणे यांच्या लेखनशैलीवर विस्तृत टिप्पणीही त्यांनी केले. राणे यांनी आपल्या मनोगतात सर्वांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचे निवेदन प्रथितयश निर्माती व निवेदिका, अक्षदा भालेकर-विचारे यांनी केले. लीना रेडकर यांनी स्वागतपर भाषण व आभार प्रदर्शन केले.

चित्रपटासाठी ज्या कथा लिहिल्या जातात, त्या संक्षिप्त स्वरूपात असतात आणि त्यांना वन लाईनर असे म्हणतात. ही वनलाईनर चित्रपटासाठी निश्चित झाल्यानंतर, त्या वनलाईनरचा विस्तार होऊन, चित्रपटांची कथा तयार होते. थोडक्यात म्हणजे चित्रपटाचे कथा बीज आणि ठळक मुद्दे या वनलाईनरमध्ये असतात. वनलाईनर वाचून कथेचा सार व सारांश लक्षात येतो. अशा वनलाईनर चित्रपट निर्मात्यांना ऐकवायची प्रथा आहे. कुणी लेखक एका वेळेला दोन ते तीन वन लाईनर निर्मात्याला ऐकवू शकतो. अशा या कथांचे हे पुस्तक आहे. 

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content