Homeन्यूज अँड व्ह्यूजयंदाच्या पावसातही ठाण्यातल्या...

यंदाच्या पावसातही ठाण्यातल्या आनंदाश्रम परिसराची रडगाथा सुरूच!

पावसाळा सुरु झाला की ठाणे शहर व आसपासच्या भागातील विविध रस्त्याच्या कहाण्यांनी वर्तमानपत्रे भरून जात असतात. (तसे पाहिले तर इतर शहरांमध्येही अशीच रडकथा असते.) ठाणे महापालिकेतील सत्ताकेंद्राचे महत्त्वाचा बिंदू असलेल्या ‘आनंदाश्रम’ परिसरातील रस्त्यांचीही अशीच रडकथा आहे. वरवर पाहता रस्ता ठीक वाटतो. परंतु पावसाळ्यात त्याचे खरे स्वरूप उघड झाले आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जो पॅसेज निर्माण केलेला आहे तो एकदम बकवास आहे. हा पॅसेज गेल्या काही वर्षांत नव्याने केला गेलाच नसल्याची माहिती आली आहे.

आश्रमाशेजारी पारशी जनसमुदयाचा भूखंड आहे. त्याचे प्रवेशद्वारही रद्दड आहे. लोकनेते आनंद दिघे यांच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूस एक नवी इमारत उभी राहिली आहे. या इमारतीसाठी काही सुविधा देणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार रस्त्याच्या मधोमध खड्डे खणून या सुविधा देण्यात आल्या. याबाबत आक्षेप नाही. परंतु नंतर हा रस्ता संबंधितांनी जवळजवळ 15/20 दिवस ठीक

केलेला नव्हता. अखेर तो केला गेला. पण तो समतल नाही. त्यामुळे नको तेथे ‘जर्क’ बसत आहेत. आश्रमातून तालावपाळीच्या दिशेने जाणारा फुटपाथ आश्रमाच्या हद्दीपर्यंत उत्तम आहे. मात्र इतरत्र बकवास आहे. महापालिका चालवणाऱ्या पक्षनेत्याला हा सर्वच फूटपाथ चकाचक करायचा होता असे नागरिकांचे मत आहे.

मार्केट सुरु होतानाच्या रस्त्यावर थोडा पाऊस पडला तरी पाणी तुंबते! गेली अनेकवर्षे यावर उपायच शोधला गेलेला नाही. तीच गत वाहतूक चौकीच्या बाजूला असलेल्या मैदानाची झाली आहे. मैदानात तर चिखल आहेच. परंतु प्रवेशमार्गाचीही हालत झालेली आहे. तसेच ठाणे स्थानकाकडे जाणाऱ्या सॅटिस पुलाखालील रस्त्यावर पाणी तुम्बण्याची समस्या अजूनही सुरूच आहे. (तालावपळीच्या समोरील बाजूस) आता सत्ताकेंद्र असलेल्या आनंदाश्रम परिसरातील उण्यापुऱ्या 100-150 पावलांत महापालिकेच्या अशा कारभाराचा अनुभव येत असेल तर घोडबंदर रोड, कोपरी, माजिवाडा, आनंद नगर, लोकमान्य नगर, कोलशेत, ढोकाळी नाका आदी परिसरात काय अनुभव येत असतील याचा विचारच केलेला बरा!

छायाचित्र मांडणीः सोनाली वऱ्हाडे

Continue reading

नव्या महापालिका आयुक्तांचे स्वागत करताना…

मुंबईच्या पहिल्या महिला महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे मुंबईकरांच्या वतीने स्वागत करताना त्यांना मुंबईतल्या गिरगावातल्या 'हौदा'कडे बोट दाखवण्याची इच्छा नव्हती. परंतु त्या मुंबईच्या मेट्रो प्रकल्पाच्या प्रमुख होत्या. आजही तो अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडेच आहे, त्यामुळे हीच संधी घेतली म्हणाना. मुंबई...

लांब जटा.. टिळा-टोपी-माळा, अशा प्रतिमेला छेद देणारा भोंदू!

कॅप्टन नसलेल्या आणि इयत्ता दहावी नापास असलेल्या अशोक खरात नामक भोंदूबाबाच्या विविध कथांनी राज्यातील वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने सध्या भरून वाहत आहेत! तसे पाहिले तर आपल्या राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला बुवाबाजींनी ग्रासलेले आहे. कुठे आसाराम आहेत तर कुठे बाबा...

सत्यमेव जयते!

अलीकडे आपल्या सार्वजनिक व खासगी बँकामधील गैरप्रकारांची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. भविष्यात आणखीही येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे अशा सर्व प्रकरणाची एक खासियत आहे की, बँकेचे संबंधित अधिकारी वा संबंधित व्यवसायिक एकदा का न्यायालयात गेले की न्यायांचे 'दळण' सुरु...
Skip to content