Wednesday, March 12, 2025
Homeपब्लिक फिगरडॉ. उज्ज्वला जाधव...

डॉ. उज्ज्वला जाधव यांचा भाजपला रामराम; काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई विद्यापीठात बायोलॉजीच्या विभागप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झालेल्या डॉ. प्रा. उज्ज्वला जाधव यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यत्वाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर उज्ज्वला जाधव यांनी मुंबईच्या आझाद मैदान येथील राजीव गांधी काँग्रेस भवन येथे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

खासदार वर्षा गायकवाड यांनी डॉ. जाधव यांना पक्षात प्रवेश देताना त्यांच्या हाती काँग्रेसचा झेंडा दिला आणि पक्षाच्या मजबुतीसाठी डॉ. उज्ज्वला जाधव उत्तम काम करतील असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक भला मोठा पुष्पहार खासदार गायकवाड आणि डॉ. जाधव यांना घालून आनंद व्यक्त केला.

डॉ. उज्ज्वला जाधव २०१४पासून भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या म्हणून कार्यरत होत्या. आज सकाळी त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष लल्लुसिंग आर्य, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

डॉ. उज्ज्वला जाधव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा माजी आमदार अशोक जाधव, विविध पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. लोकसभा निवडणूक प्रचार टिपेला पोहोचला असताना भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याची भाषा वारंवार करीत होते. यासाठी चारशे पारचा नारा दिला जात होता. मी डॉ. आंबेडकर यांची निष्ठावंत कार्यकर्ती असून भारतीय संविधानाशी एकनिष्ठ असल्याने मला भारतीय जनता पार्टीची भूमिका पटत नव्हती म्हणून मी भारतीय जनता पक्ष सोडण्याच्या निष्कर्षाप्रत आले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार प्रा. वर्षा गायकवाड, माजी मंत्री नसीम खान आदींची भेट घेऊन चर्चा केली आणि अखेर आज काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला, असे डॉ. उज्ज्वला जाधव यांनी सांगितले.

Continue reading

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...

भारतात महिलांच्या आत्महत्त्यांपैकी ३६.६% तरुणींच्या!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य अधिक प्रमाणात असून जागतिक स्तरावर ही समस्या अधिक व्यापक आहे, असा अहवाल नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एमपॉवर, या अभ्यास गटाने प्रसिद्ध केला आहे. भारतात पुरुषांपेक्षा हे प्रमाण दुप्पट असून यात...
Skip to content