Homeपब्लिक फिगरडॉ. उज्ज्वला जाधव...

डॉ. उज्ज्वला जाधव यांचा भाजपला रामराम; काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई विद्यापीठात बायोलॉजीच्या विभागप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झालेल्या डॉ. प्रा. उज्ज्वला जाधव यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यत्वाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर उज्ज्वला जाधव यांनी मुंबईच्या आझाद मैदान येथील राजीव गांधी काँग्रेस भवन येथे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

खासदार वर्षा गायकवाड यांनी डॉ. जाधव यांना पक्षात प्रवेश देताना त्यांच्या हाती काँग्रेसचा झेंडा दिला आणि पक्षाच्या मजबुतीसाठी डॉ. उज्ज्वला जाधव उत्तम काम करतील असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक भला मोठा पुष्पहार खासदार गायकवाड आणि डॉ. जाधव यांना घालून आनंद व्यक्त केला.

डॉ. उज्ज्वला जाधव २०१४पासून भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या म्हणून कार्यरत होत्या. आज सकाळी त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष लल्लुसिंग आर्य, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

डॉ. उज्ज्वला जाधव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा माजी आमदार अशोक जाधव, विविध पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. लोकसभा निवडणूक प्रचार टिपेला पोहोचला असताना भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याची भाषा वारंवार करीत होते. यासाठी चारशे पारचा नारा दिला जात होता. मी डॉ. आंबेडकर यांची निष्ठावंत कार्यकर्ती असून भारतीय संविधानाशी एकनिष्ठ असल्याने मला भारतीय जनता पार्टीची भूमिका पटत नव्हती म्हणून मी भारतीय जनता पक्ष सोडण्याच्या निष्कर्षाप्रत आले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार प्रा. वर्षा गायकवाड, माजी मंत्री नसीम खान आदींची भेट घेऊन चर्चा केली आणि अखेर आज काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला, असे डॉ. उज्ज्वला जाधव यांनी सांगितले.

Continue reading

तृप्ती देसाईंच्या आरोपांवर नीलम गोऱ्हेंचा पलटवार!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महिला नेतृत्त्वावरून नवा संघर्ष पाहायला मिळत आहे. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुंबईत तातडीची पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. या दोन्ही नेत्यांमधील...

युद्धाच्या वणव्यात गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा!

पश्चिम आशियातील युद्धाचा ३१वा दिवस जागतिक अर्थव्यवस्थेसाठी 'ब्लॅक मंडे' ठरला आहे. इस्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचल्याने जागतिक बाजारपेठेत भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचे थेट पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले आहेत. सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड...

शरद पोंक्षेंच्या विधानाने खळबळ, भाजपाई अस्वस्थ!

प्रखर हिंदुत्ववादी विचार आणि सावरकरभक्तीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. "मी भाजपसारखे दहा पक्ष उभे करू शकतो," असे खळबळजनक विधान पोंक्षे यांनी केल्यामुळे राजकीय...
Skip to content