Homeचिट चॅटडॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींची...

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींची १२५वी जयंती साजरी

मुंबईत बोरिवली पश्चिम येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उत्तर मुंबई जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्रेष्ठ भारत घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या व प्रखर देशभक्त डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची १२५वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार संजय उपाध्याय, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळा तावडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी मुखर्जी यांना आदरांजली वाहिली.

यानिमित्ताने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. वक्ते म्हणून भाजपाचे उत्तर मुंबई पूर्व जिल्हाध्यक्ष व प्रवक्ते गणेश खणकर यांनी डॉ. मुखर्जी यांच्या पूर्वस्मृतींना उजाळा दिला. डॉ. मुखर्जी यांनी देशासाठी दिलेले बलिदान, त्यांनी दिलेली अंत्योदय संकल्पना व प्रेरणा यातूनच सतत गोरगरीब जनतेसाठी झटत राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कार्यरत राहणार असल्याचे प्रतिपादन गोपाळ शेट्टी यांनी यावेळी केले. आमदार उपाध्याय यांनीदेखील डॉ. मुखर्जी यांनी दिलेल्या शिकवणीतूनच पुढे मार्गक्रमण करणार असल्याचे सांगितले. ‘खून भी देंगे.. जान भी देंगे.. मगर देश की मिट्टी कभी नही देंगे’.., ‘देशात दोन विधान दोन प्रधान’ कदापि चालणार नाही, असा नारा डॉ. मुखर्जी यांनी दिला होता. त्याची आठवणही त्यांनी करून दिली.

आमदार उपाध्याय यांनी अंत्योदय ह्या संकल्पनेतून शैक्षणिक सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या व अपघातात एक हात पूर्णपणे गमावलेल्या, अपंग असलेल्या बोरिवलीतील हर्षिता सिंग हिला गोपाळ शेट्टी यांच्या पुढाकाराने कॉम्प्युटर भेट देतानाच तिला १०वीपर्यंत मोफत शिक्षणाची सोय करून देत, तिला आधुनिक हात प्रत्यारोपण करण्यासाठी दिनेश झाला यांच्या सहकार्याने मदत करणार असल्याचे उपाध्याय यांनी जाहीर केले. दहावी परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केल्याबद्दल अनेक गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि शैक्षणिक साहित्यांचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने महिलांना तुळशीच्या रोपांचेदेखील वाटप याप्रसंगी करण्यात आले.

भाजपा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष बाळा तावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Continue reading

हा पाहा महायुती सरकारचा दुटप्पीपणा!

देशातीलच नव्हे तर जगातील शास्त्रज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञ यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे कबुतरापासून माणसाच्या फुफ्फुसाला धोका निर्माण होतो, हे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने योग्य निर्णय देत यावर बंदीही आणली असतानाही, दादरला एक समुदाय कबुतरांना खायला दाणे टाकून न्यायालयाच्या निर्णयाला...

कोमसाप मुंबईच्या अध्यक्षपदी विद्या प्रभू; जगदीश भोवड जिल्हा प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षपदी विद्या प्रभू यांची निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्ष मनोज वराडे आणि विद्या प्रभू यांच्यात लढत झाली. त्यात विद्या प्रभू विजयी झाल्या. यावेळी मुंबई जिल्ह्याची कार्यकारिणीही निवडण्यात आली. केंदीय समितीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून जगदीश...

महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेसाठी नोंदवा 31 ऑगस्टपर्यंत सहभाग

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 3 नोव्हेंबर, 2025पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांंसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांंसाठी नाट्यसंस्थांकडून येत्या 31 ऑगस्ट, 2025पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती...
Skip to content